Thursday, November 27, 2008

शहिदों की चिताओं पर ...


शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"

आज ही पोस्ट लिहीत असताना अजुन "भय इथले संपत नाही" अशीच अवस्था आहे, तिकडे आपले बहादुर जवान व सर्वसामान्य जनता अजुनही ह्या अमानुष, भयंकर, राक्षसी अशा लादलेल्या परकीय दहशतवादाशी प्राणपणाने लढते आहे. च्यायला २४ तास उलटुन गेले तरी अजुन कोणीही अजुन पुर्णपणे "दहशतवाद संपवला" ह्याची हमी द्यायला तयार नाही, हा हल्ला आहे की युद्ध ?

होय, हे एक प्रकारचे "अघोषीत युद्धच" आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर एक ठळठळीतपणे जाणवणारे प्रश्नचिन्ह उभे करणारे. २४ तासांपेक्षासुद्धा जास्त लढा द्यायला ह्यांचाकडे एवढा मोठ्ठा शत्रसंभार आला कुठुन ह्याची मुळापासुन चौकशी व्हायला हवी. काल ऐकले होते की हे हरामी आपल्याबरोबर "सॅकमध्ये शस्त्रे" बरोबर घेऊन आले होते. कसं शक्य आहे ?

सॅकमध्ये मावतील एवढी शस्त्रे घेऊन जर कोणी अख्खी मुंबई, पोलीस यंत्रणा, सेना व खास अशा परिस्थीतीत लढण्याचे प्रशिक्षण दिलेले " नॅशनल सिक्युरीटी गार्ड्स" ह्यांना २४ तासापेक्षा जास्त वेठीस धरु शकतो हे मला तर अशक्य वाटते, ह्यामागे फ़ार मोठ्ठे षडयंत्र असण्याचा आम्हाला संशय आहे.

असो. सेना व जवान आपले काम चोख करत आहेत, सध्या त्यांना पाठिंबा व धीर देणे महत्वाचे, बाकीचा तपास व चौकशी नंतर होऊ शकते ( पण झाली पाहीजे हे नक्की ).सध्या त्याम्चे मनोधर्य विचलीत होईल असे कोणतेही पाऊल आपण उचणार नाही ह्याची दक्षता घ्यायला हवी ....

आत्तापर्यंत १०० हुन अधिक निरापराध सर्वसामान्य नागरीक व ११ पोलीस अधिकारी ह्या हल्ल्यात मरण पावले आहेत, नव्हे "शहिद" झाले आहेत. त्यांच्या बलिदानाची आम्हाला नेहमीच आठवण राहिल, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी अपेक्षा बाळगुयात ....
शहिदों तुम्हे लाख सलाम ...
आता जबाबदारी सर्वांचीच वाढली आहे, सर्वांनी ही गोष्ट आता सिरीअसली घ्यायलाच हवी, सध्या सवंग आणि बेजबाबदार मिडीयाने तर जरुर ...
जाता जाता लतादिदींच्या एका अजरामर गाण्यातला एक तुकडा,
"ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी,
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुरबानी"
शिवाय आत्ता आठवलं म्हणुन एक व्हिडिओ सुद्धा, बरेच काही घेण्यासारखे आहे यातुन, पहा ..

बाकी आमच्या हातात लेख लिहणे आणि श्रद्धांजल्या वाहणे ह्याशिवाय अजुन काही तरी काय ?

असो, वेळ येईल एखाद्या दिवशी नक्की ...

ता.क. : हा "लेख" इथे संपला नाही, आज फ़क्त जास्त लिहणे उचीत नाही म्हणुन इति लेखनसीमा. बाकी वाचलेल्या आणि पाहिलेल्या घटनांवर सविस्तर (माझे ) विश्लेषण येत्या काही दिवसात जरुर लिहीन ...