Friday, November 20, 2009

स्टार माझा आणि वाचकांचे आभार ... जिंकलो रे !!!

आज सकाळी सकाळीच आमच्या एका अस्सल पुणेकर मित्राचा आमच्या मोबाईलवर फ़ोन आला, च्यायला म्हणलं आता सकाळ सकाळ शिव्या खाव्या लागणार.
पण अहो आश्चर्यम, त्याने २-३ माफ़क शिव्यातच आपला मायना आवरता घेऊन "तुला स्टार माझाच्या ब्लॊग माझा ह्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे" अशी बातमी दिली.

ऒफ़िसमध्ये जाऊन ई-मेल्स चेक करुन बघितले असता स्टार माझाचे संपादक "श्री. प्रसन्न जोशी" ह्यांची अभिनंदन करणारी व निकाल घोषीत करणारी मेल दिसली.
खुप आनंद झाला मित्रानों.
खुप खुप आभारी आहे.

एवढा व्यापक आणि अवाढव्य आवाका असलेली स्पर्धा भरवुन ती यशस्वीपणे पेलल्याबद्दल स्टार माझाचेही अभिनंदन व आभार ...
अशा संस्थांकडुन मिळणा-या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकामुळे लिहायला हुरुप येऊन नवे अजुन ब्लॊग्स ह्या मराठी ब्लॊगर्सच्या विश्वात दाखल होतील असा आमचा विश्वास आहे.
धन्यवाद स्टार माझा ...

ह्याबरोबर आम्ही आमच्या ह्या यशाचे श्रेय मिसळपाव.कॊम लाही देऊ इच्छितो.
कारण आमच्या भल्या-बु-या लेखनाची सुरवात, कौतुक, विकास हा इथेच घडला.
आजसुद्धा मिपाकरांनी आमचे भरपुर कौतुक केले. धन्यवाद मित्रांनो ...

नॊट दी लिस्ट, आमच्या ब्लॊगच्या तमाम वाचकांचे व हितचिंतकांचे आभार कारण तुमच्या कौतुकामुळे व पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही नवनविन विषयावर उत्साहात लिहीत असतो.
असाच लोभ राहुद्यात ...

स्पर्धेतल्या इतर विजेत्यांचेही मनापासुन अभिनंदन ...!!!
असेच लढा दोस्तांनो.

धन्यवाद ... !!!

- ( आभारी ) छोटा डॊन

Tuesday, November 17, 2009

स्ट्रेट ड्राईव्ह, हाराकिरी आणि ऒफ़साईड वगैरे वगैरे...

म्हणजे बघा सिच्युएशन प्रचंड कॉप्लेक्स आहे. भल्याभल्या समिक्षकांचा आणि ह्या क्षेत्रातल्या दादा माणसांचा ह्यात कस लागु शकतो.

" एक वेल सेट फलंदाज (उदा : सचिन तेंडुलकर ) कसलेल्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत एखाद्या भिंतींसारखा खेळपट्टीवर उभा आहे. विरुद्ध बाजुच्या कर्णधाराचे आणि गोलंदाजचे सर्व डावपेच त्याच्या सरळ बॆटीमधुन आलेल्या ड्राईव्हच्या फ़टक्याबरोबर सीमीरेषेपार वाहुन जात आहेत. बघता बघाता त्याचे द्विशतक जवळ आले आहे, १९९ धावा बोर्डावर लागल्या आहेत. पटकन १ धाव काढुन द्विशतक पुर्ण करण्याची तडप त्याच्या चेहर्‍यावर सहाजिकच स्पष्टपणे दिसत आहे व ह्याच घोळात तो एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अर्थातच ही धाव मुळीच चोरटी वगैरे नसते, तो असते विरुद्ध संघाच्या धुर्त कर्णधाराचा ( उदाहरणार्थ : हिंदी-इंग्लिश मिडीया ) एक कसलेला डाव. बॅटवर आलेला एक सरळ, साधा चेंडु कव्हरकडे हलकेच ढकलुन तो धव घेण्यासाठी पळायला प्रारंभ करतो. ठरल्याप्रमाणे गोलंदाज चेंडुला कव्हर देण्याच्या बहाण्याने फलंदाजाला आडवा जातो व त्याचा धक्का लागुन फलंदाज पडतो. तोवर तिकडे दक्ष असलेल्या क्षेत्ररक्षकाचा थ्रो बरोबर स्टंपकडे जाऊन यष्ट्या उद्धवस्त होतात. गोलंदाज व क्षेत्ररक्षक जोरदार अपिल करतात व नियमाप्रमाणे जरी फलंदाज बाद असला तरी नैतिकदॄष्ट्या हे चुकीचे आहे हे माहित असुनसुद्धा आपले कर्तव्य म्हणुन पंच ( इथे उदाहरणार्थ : बाळासाहेब ठाकरे ) त्याला बाद देतात. फलंदाज निराश होऊन तंबुत परततो व टीव्हीसमोर बसलेले स्वयंघोषीत समिक्षक ( उदाहरणार्थ : विविध पक्षांचे प्रवक्ते की ज्यांना कधीमधी अशा घटनांवर प्रतिक्रिया देऊन लाईमलाईटमध्ये रहावे लागते. असो, तो मुद्दा वेगळा ), सामान्य प्रेक्षक, क्रिडाप्रेमी विरुद्ध संघाचा डावपेच समजुन न घेता पंचाच्या नावाने मनोसोक्त खडे फोडुन रिकामे होतात ....."

सध्या असेच काही घडले आहे ना ?

आपल्या (अरे हो, आख्ख्या देशाच्या म्हणावे लागेन ना. आजकाल उगाच कशाला रिस्क घ्या बाबा) सचिनच्या कारकिर्दीला २० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने घडत असलेल्या समारंभात व मुलाखतीत एका (हलकट म्हणावे का?) पत्रकाराने मुद्दामुन खाजवुन खरुज काढण्याच्या उद्देशाने "मुंबई"विषयी प्रश्न विचारला. अर्थातच सचिन (आमच्या पवारकाकांसारखा) कसलेला राजकारणी नसल्याने त्याने निरागसपणे आणि प्रामाणिकपणे "I am extremely proud of being a Maharashtrian, but Mumbai is a part of India and I play for India" असे उत्तर दिले. तसे पाहिले तर टेक्निकली ह्या उत्तरात अजिबात काही चुक नाही, त्याचा अर्थही अगदी सरळ आहे.
पण आता कहानी मे ट्विस्ट इथे आहे, लगेच ह्या वाक्याला प्रमाण मानुन व त्याला हवे तसे वाकवुन देशभरातल्या मिडीयाने "सचिन म्हणतो, मुंबई सगळ्यांचीच. प्रदेशवादाला सचिनचे स्ट्रेटड्राईव्हद्वारे खणखणीत उत्तर" वगैरे कंड्या पिकवायला सुरवात केली. वास्तविक पहाता ज्याची काही आवश्यकता नव्हती त्या वादाला सुरवात इथे मिडियाकडुनच घडाली. मुळात ते वाक्य त्या उद्देशाने उच्चारले गेले नसतानाही त्याचा हवा तसा अणि स्वतःच्या सोईचा अर्थ काढुन उगाच रान पेटवणे हे मिडियाच्या कोणत्या तत्वात बसते ?
जवळपास ३ प्रहरे मिडियाने हा हैदोस घातल्यानंतर (राज ठाकरेच्या मराठी टक्क्याच्या जबरदस्त तडाख्याने आधीच घायाळ असलेली) शिवसेना आता ह्या वादात उतरली. दुसर्‍या दिवशी सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन " सचिन, तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ! " ह्या शिर्षकाखाली सचिनला ( सो कॉल्ड ) ४ खडे बोल सुनावणारे शिवसेनाप्रमुखांचे (?) पत्र प्रसिद्ध झाले.
अपेक्षेप्रमाणे देशभरचा मिडिया अधिक पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवणारे समिक्षक, प्रवक्ते वगैरे टिनपाट लोक लगेच ठाकर्‍यांवर आणि शिवसेनेवर तोंडसुख घेऊ लागले. इथे ठाकर्‍यांनी तर फक्त त्यांचे कर्तव्य केले होते हे मात्र सर्व सोईस्करपणे विसरले.

----------------------------------------------------------------

आता काही आमचे मुद्दे किंवा अस्ताव्यस्त विचार :

१. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंड सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता.
सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतेवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही?
होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ?
देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ?
(ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.)

२. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ?
एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते.
मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.

३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला.

४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम.

ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे. ह्या समजुतदारपणासाठी मनसेचे अभिनंदन ...!!!

आता २ शब्द सचिनसाठी :
सचिन तु आमचा देव होतास आणि आहेस आणि चिरंतन राहशीलही. पण तुझे देवत्व आम्ही फक्त क्रिकेटच्या खेळपट्टीपुरतेच मानतो ह्यात मात्र गल्लत होऊ देऊ नकोस, समोरच्याचे डावपेच ओळखुन बॉल तटवायला लागला तरी हरकत नाही.
तु जर ह्या जागी फुटबॉल खेळत असता तर आम्ही त्वरित "ऑफसाईड" चा फ्लॅग दाखवला असता, कमीत कमी ह्या खेळात ह्या क्षणाला खेळ थांबुन पुर्वीची चाल बाद ठरुन पुन्हा पहिल्यापासुन चाली रचाव्या लागतात.
मात्र क्रिकेटचे आणि समाजकारणाचे ( किंवा राजकारणाचे ) असे नाही , इथे फलंदाजाने एकदा टोलावलेला चेंडु किंवा तुझ्यासारख्य एखाद्या आयकॉनने मुखातुन उच्चारलेले वाक्य ह्याला परतीचे वाट नसते....त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो, चेंडु सीमापार जाऊन विजयध्वज फडकावु शकतो किंवा झेल जाऊन आख्खा सामनाच गमावण्याची पाळी येऊ शकते.

- तुझा एक चाहता
छोटा डॉन

Thursday, November 12, 2009

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं. त्यांनी करदात्यांचे वैफल्य, सामान्य माणसाचे जिवन, राडेबाजी ह्या मुद्द्यांचा आधारे आपल्या राखीव कुरणात बेसलेस विधाने आणि आगापिछा नसलेले आरोप घेऊन बराच उतमात घालता.शेवटी आमच्या पराला "शोध विचारवंताचा " नामक मोहीम राबवावी लागली.
सूहासने एक दणदणीत अणि मुद्देसुद प्रतिसाद देऊन ह्या विचारवंतांच्या धोतरालाच हात घातला व अवलियाशेठनी त्यांच्या निषेधाद्वारे ह्यांच्य वर्मावरच घाव घातला.

त्याच पार्शभुमीवर आम्ही ४ ओळी खरडल्या आहेत, मुळ प्रेरणा हे "मंगेश पाडगावकरांची एक कविता" ...
जे आहे ते गोड मानुन घ्या ... ;)

********************************************************


यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

नव्या रक्ताचे सुशिक्षीत युवक
'नवनिर्माणासाठी' जमणार,
चर्चा, निदर्शन, आंदोलन, निषेध
करीत प्रवाहात उरतणार !

यांच सुख नसतच मुळी
कधी ह्यांच्यासाठी,
एकच गोष्ट यांची असते
कपाळावर आठी !

कधीसुद्धा यांचा संयम ढासळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?

यांचा धोशा सुरु असतो
'रस्त्यावर उतरणं वाईट,
त्यानं ट्राफिक ज्याम होतं !
आंदोलनं मुळीच करु नका,
त्याने सामान्यांचं जीणं हराम होतं !
क्रांत्या-बिंत्या सगळं झुट,
त्याने करदात्यांना वैफल्य येतं! '

संयमाचे पुतळेच हे
यांच रक्त चुकुनही सळसळत नाही !
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार?

पांढरपेशी सुखवस्तु कोष झुगारुन कोणी
अन्यायाविरुद्ध उभारतचं ना ?
हातात फलक घेऊन जयघोषात
रस्त्यावर उतरतंच ना?

असं काही दिसलं की
यांच माथं भनकलचं,
यांच्या वैचारिकतेचं गळु
अवघड जागी ठणकलचं !

वांझोट्या शाब्दिक चर्चांचं यांच्या
वेगवाग घोडं असतं !
पण यांना समविचारी भेटतात कसे
हे एक कोडं असतं ?

या कठिण कोड्याचं उत्तम मात्र मिळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

कसल्याही राड्याला
हे सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात

एरंडेल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं
दुसरीकडे कुठे जाणार ?

कारण आणि परिणाम
यांच नातं टळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?

- (राडेबाज) छोटा डॉन

Tuesday, November 10, 2009

.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!

२ दिवसापुर्वी महाराष्ट्र विधानसभेत जे घडले ते निश्चितच आपल्या गौरवशाली (आता हा शब्द निर्रथकपणे किती दिवस वापरायचा हा प्रश्नच आहे, कसला गौरव ते हर्षवर्धन पाटील जाणोत) परंपरेला साजेसे जरी नसले तरी ते आवश्यक जरुर होते. बाकी आम्हाला तांत्रिक बाबीत घुसायचे नाही पण जे काही घडले ते पाहुन बरे वाटले इतकेच म्हणतो.

अबु आझमी हा इसम मुळातच मस्तवाल आहे. हा माणुस महाराष्ट्रात निवडुन कसा येतो हेच आश्चर्य आहे त्याबद्दल त्या मतदारसंघातल्या (उरल्या-सुरल्या) मराठी किंवा अमराठी पण महाराष्ट्रिय माणसाने आत्मपरिक्षण करायला हवे. मतदारसंघातला निवडक युपी/बिहार वाले मतदार आणि जमलेच तर धर्माच्या नावावर अजुन काही मतदार गोळा करुन त्यांना चुचकारायचे, पाण्यासारखा पैसा ओतायचा, सोबत पोसलेले गुंड आहेतच "इतर" कामे उरकायला, मग काय झाले निवडुन न यायला ?
असो, तो वेगळा मुद्दा आहे ...

मनसेची मागणी अतिशय साधी होती, त्याचा इतर जणांना उगाच प्रेस्टिज इश्श्यु करायची गरज नव्हती, शिवाय हे करत असताना आपण प्रत्यक्ष राज्याच्या भाषिक अस्मितेला आव्हान देतो आहे हे त्यांच्या लक्षात येईल अशी सुज्ञ अपेक्षा ठेवण्याइतके आपण मुर्ख नाही आहोत. त्यामुळे जे काही घडले त्याचे आधीच पुर्ण कॅक्ल्युलेशन करुन आझमींनी अडेलतट्टुपणाकरुन वाद ओढावुन घेतला व त्यात तापलेल्या तव्यावर इतर पक्षांनी "मनसे विरोधी द्वेषाची" पोळी भाजुन घेतली असे आमचे मत झाले आहे ...

झालेल्या घटनेस सर्वस्वीपणे स्वतः अबु आझमी आणि सरकारमधले उच्चपदस्थ की ज्यांना काय आणि कसे घडेल व त्यांचे देशभर पडसाद काय उमटतील ह्याची पुर्णपणे कल्पना होती पण त्यांनी जाणुनबुजुन निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळुन परिस्थिती एवढी चिघळु दिली.
मनसेच्या लढाऊ आमदारांचे अभिनंदन व इतर बोटचेप्या आमदारांचा धिक्कार ...!!!

काही महत्वाचे मुद्दे की जे पाहुन हे कारस्थान मुद्दामुन मनसेला आडवे जाण्यासाठी रचले गेले अशी आम्हाला शंका येते.

१. जरी कायद्याप्रमाणे कोणताही आमदार अगर खासदार राज्यघटनेत सुचवल्या गेलेल्या मातॄभाषेव्यतिरिक्त इतर १८ भाषात शप्पथ घेऊ शकत असला तरी ह्याचे प्रयोग वारंवार महाराष्ट्रातच कशासाठी ?
इतर राज्यातले समकक्ष उदाहरण डोळ्यासमोर आहे काय ? का मराठी अस्मितेला नेहमीच आव्हान देऊन मराठी माणसाला किंवा मनसेसारख्या मराठी मुद्दा घेऊन लढणार्‍या पक्षाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असे उचकावले जाते ?

२. अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहेत, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे व त्यांची मातॄभाषा हिंदी असल्याने व त्यामुळेच मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रिय जनतेच्या सन्मानासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ?
शिव्यागाळी करायला बरी मराठी जमते ?

३. राज ठाकरे ह्यांनी पुर्वसुचना देऊनसुद्धा प्रकरण एवढ्या थराला गेले ह्यावरुन सरकारने मुद्दामुन हयकडे डोळेझाक केली व नंतर तत्परतेचा आव आणुन कारवाई केली असे आम्हाला वाटते.
आजपर्यंत संसदेत कितीवेळातरी "मार्शल्स" बोलावले आहेत मग ही काळजी काल का घेता आली नाही ?

४. ज्यांनी अजुन शपथच घेतली नाही अशा २ आमदारांना ४ वर्षासाठी निलंबीत करणे ह्याचाच अर्थ सरकार आधीच घुडघ्याला बाशिंग बांधुन बसले होते असा घ्यायचा का ?

५. अबु आझमींना सभापतींच्या आसनासमोर उभे राहुन जी "चप्पल दाखवली" व त्यानंतर अ‍ॅच्युअल धक्काबुक्कीला सुरवात झाली हा महत्वाचा मुद्दा सरकारच्या दृष्टीने काहीच किमतीचा नाही का ?
चप्पल दाखवल्यावरही अबु आझमी निर्दोष ठरुन सभागॄहात बसुच कसे शकतात ?

६. शपथ घेऊन खाली उतरल्यावर मात्र फलक फडकावणार्‍या "शिशीर शिंदे" ह्यांना ढकलुन त्यांच्याशी धक्काबुक्कीची सुरवात कोणी केली हे सरकारने तपासुन पाहिले आहे काय ?
मिडिया फुटेजमध्ये तर स्पष्टपणे आधी आझमींनी ढकलल्याच दिसते आहे ....

७. "वसंत गिते" ह्यांनी नेमके काय केले हे कळु शकेल काय ? कारण आम्ही जे काही फुटेज पाहिले त्यात गिते हे बरेच मागे अथवा प्रत्यक्ष सहभागी नसल्याचे आढळले.
केवळ नाशकात सरकारातल्या एका वरिष्ठ मंत्र्याला स्पर्धा नको म्हणुन गितेंना बाहेर काढण्यात आले काय ?

८. वाद होणार हे माहित असुनसुद्धा सरकारतल्या कोणी वरिष्ठांनी अबु आझमींना विनंती करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असे काही घडले आहे का ? नसल्यास का नाही ह्याचे उत्तर मिळावे ?
सभागॄहात शांतता रहावी हे सगळ्यांचेच कर्तव्य नाही का ?

९. आता महत्वाचा मुद्दा की वर्षाची शिक्षा कितपत योग्य आहे ?
आमदार एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का ?
६० च्या दशकात "जांबुवंतराव धोटे" ह्या विदर्भातल्या आमदाराने थेट सभापतींना पेपरवेट फेकुन मारला त्या प्रकरणात किती शिक्षा झाली होती ?
दस्तुरखुद्द "छगन भुजबळ" हे जेव्हा शिवसेनेचे एकमेव आमदार होते तेव्हा ते एवढा धिंगाणा घालत की त्यांना कित्येकवेळा मार्शलकरवी अक्षरशः "उचलुन" सभागॄहाबाहेत न्हेले असल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा किती शिक्षा व्हायची भौ त्यांना ?
शिवसेनेच्या गुलाबराव गावंड्यांनी भर विधानसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन घेऊन स्वतः रोबरच इतर सदस्यांनाही धोका उत्पन्न केला होता, त्याचे संदर्भ घेतले आहेत काय ?
कित्येकवेळा माईक उखडले, कागदपत्रे फेकली, धाराधरी व पळापळी झाली, धक्काबुक्की सदृष्य घटना ह्याच सभागॄहात घडल्या आहेत, मग ह्यावेळीच इतकी कठोर शिक्षा का ?


जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.

आता ह्यातुन आपले ( पक्षी : सर्वसामान्य मतदाराचे ) नुकसान असे झाले की जे मनसे चे आमदार विधानसभेच्या कार्यकाळात प्रश्न विचारुन अथवा पाठपुरावा करुन सरकारला अडचणीत आणु शकले असते ते आता बाहेत गेले आहेत. त्या ४ जणांचा "आमदार निधी" ही माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात होणार्‍या भविष्यातील विकासकामांना ह्याची निश्चितच कमतरता भासेल ...
एवढी कठोर शिक्षा द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती ...

फायनली जर ही घटना समराईझ करायची म्हणले तर मी असे म्हणेन :
अबु आझमीने आपण युपी / बिहार वाल्यांचे आणि महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या हिंदीभाषिक लोकांचे सध्याचे "एकमेव तारणहार" आहोत ही प्रतिमा मजबुत करण्यात यश मिळवले. अबु आझमीचे आज देशपातळीवर नाव झाले हे सत्य आहे. any publicity is good publicity ... !!! अबु आझमीसाठी सरळसरळ विन-विन सिच्युएशन आहे ...
मनसेबाबत म्हणाल तर आपणच आता एकमेव मराठी अस्मितेचे तारक आहोत हा दावा त्यांनी चांगलाच मजबुत केला, भले त्यांना ह्या प्रकरणात ४ लढाऊ आमदारांच्या निलंबनाचे नुकसान सोसावे लागले. बरेच लोक म्हणत आहेत की हे बाहेर गेले ४ जण पुढच्या वेळी अजुन ४० जणांच्या खांद्यावर बसुन थाटामाटात विधानसभेत प्रवेश करतील, होप सो तसेच घडेल. तसे बघायला मनसेसाठीही ही "विन-विन" वाटल असली तरी मला सध्याच्या कालमर्यादेच्या कक्षात ही "विन-लुज सिच्युएशन" वाटते ....

तुर्तास मनसे आमदारांचे अभिनंदन ... !!!

जय महाराष्ट्र !!!!

Tuesday, October 27, 2009

निवडणुका आणि मानसोपचार तज्ज्ञ ...

आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात. एके काळी सरकारला फ़ोडुन काढायला हातात घेतलेला ऊस घेऊन ते (वांद्र्यातुन डागलेल्या व इकडे ) गच्चीत येउन पडलेल्या रॊकेट्सचे अवषेश एका बाजुला सारत असतात, उगाच एक विरंगुळा म्हणुन.
बराच वेळ निघुन जातो, अचानक दादुमहाराज एकदम जोशात म्हणतात “चला रे, एक अपॊइन्टमेंट आहे फ़ॊरेनच्या डॊक्टराची, कमीत कमी ही तरी जागा राखली पाहिजे ...“
सगळी सेना (पक्षी : मिलिंद, कार्यकारी संपादक व इतर १-२ गोटातले ) त्यांच्यामागोमाग निघते.

ठरल्या वेळी ते तज्ज्ञांच्या केबिनमध्ये जाऊन बसतात. मधल्या खुर्चीवर दादुमहाराज कपाळावर रुमाल घेऊन, साईडला मिलिंद एका वेळी ३-४ फ़ोनवर “ बोला, मीच साहेब आहे. “ अशी समोरच्याची बोळवण करत, दुसया बाजुला कार्यकारी संपादक उगाच टेबलावर पेपर चाळत व चेहरा वाकडा करत बसतात.

एक गोरा डॊक्टर घाम पुसत समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो.
“नमस्कार, तुमच्यातले दादुमहाराज कोण?”

(पुढेपुढे करणा-या मिलिंदाला दाबुन ) “नमस्कार, मीच दादुमहाराज”

“वेल, तुम्ही नक्की काय करता?”

“मी लढतो, आय मीन मी खरेतर वैयक्तीक स्वत: लढत नाही तरीपण पडतो.”

“इंटरेस्टिंग, मजेशीर प्रकरण आहे. लढतो ;पण लढत नाही आणि तरीही पडतो. साऊंड्स क्रेझी.
असो, आता आपण मुद्द्याकडे वळु, नक्की काय लढता किंवा नक्की काय लढत नाही तुम्ही, शिवाय तुम्ही पडता ते नक्की कशात ? “

“मी राजकारण खेळतो, निवडणुका लढतो आणि त्यातच पडतो, आय मीन मी स्वत: लढत आणि पडत नाही पण माझा प़क्ष लढतो आणि आमचे उमेदवार पडतात.”

( १ ग्लास पाणी पिऊन ) “ थांबा थांबा, आपण एकेक मुद्दा घेऊ, माझा जरा गोंधळ होतो आहे. तुम्ही राजकारण खेळता; मान्य. निवडणुका लढता आणि त्यात पडता; हे ही मान्य. पण स्वत: लढत नाही आणि स्वत: पडत नाही हे जरा गोंधळाचे असले तरी तुम्ही म्हणता म्हणुन मान्य.
पण आता ह्यात पक्ष आणि उमेदवार कुठुन आले ? जर ते पडणार असतील तर ते पडलेले लोक कुठे आहेत ? मग तुम्ही इथे कसे ?”

“मी त्यांचा नेता आहे, थोडक्यात विरोधी पक्षाचा नेता.”

“ते कशासाठी ? “

“ .... “

“ .... “

“ त्याचं असं काही खास कारण नाही”

“ बरं, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एक नेता असुन राजकारण खेळता व तुमच्या नेतॄत्वाखाली तुमच्या पक्षातले लोक निवडणुका लढतात व त्यात पडतात, करेक्ट ? “

“येस्स, यु आर राईट डॊक्टर”

“पण मग आता तुमचे उमेदवार पडतात कशामुळे हा महत्वाचा मुद्दा येतो, त्याबद्दल काही डिटेल्स ? “

( कार्यकारी संपादक एकदम उसळुन ) “ खंजीर खुपसला हो पाठीत मराठी माणसाने, आजच्या युवा पिढीला महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे महत्व कळत नाही.”

( डॊक्टर एकदम ब्लॆंक होऊन ) “ हे पहा इथे मुद्द्यांचा फ़ारच गोंधळ होतो आहे, खंजीर खुपसणारा मराठी माणुस कोण ? त्याच्यावर पोलीस का ऎक्शन घेत नाहीत ? हे युवा पिढी आणि १०५ हुतात्मे हा मुद्दा काय ? शिवाय हे महाशय कोण ? हे सुद्धा उमेदवार असुन पडले आहेत काय ? “

“ नाही; हे उमेदवार होते पण पडले नव्हते, ते सध्या राज्य .... “

(बोलणे मध्येच तोडत ) “ पुन्हा विसंगत मुद्दा, मगाशी म्हणलात उमेदवार पडतात, आता म्हणत आहात की हे पडले नाहीत ? “

“ अहो ती वेगळी निवडणुक, ही वेगळी. जाऊ दे ते मह्त्वाचे नाही, आपण मुळ मुद्द्याकडे वळु”

( डॊक्टर घाम पुसत ) “ बरं बरं, ठिक आहे. आता आपण एकेक संदर्भ गोळा करु. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार पडले की ज्याचे तुम्ही राजकारणी नेते आहात, करेक्ट ? मग आता ते कुणामुळे पडले ?”

( मिलिंद पटकन ब्लॆकबेरी उघडतो व कार्यकारी संपादक पेपरात डोके खुपसतात. )
(दादुमहाराज उद्वेगाने ) “ अहो तो आहे ना सुपारीमॆन, त्यानेच खोडा घातला.”

“पुन्हा संदर्भहीन मुद्दा. हा सुपारीमॆन कोण ? त्याने नक्की काय केले ? “

“ आधी आमच्यातच होता, एके दिवशी सनकेत राजीनामा देऊन निघुन गेला व स्वत:ची वेगळी चुल मांडली. आता निवड्णुकीत आमच्या विरोधात होता. कॊंग्रेसच्या सांगण्यावरुन त्याने मराठी माणसाची दिशाभुल करुन आमची मते फ़ोडली व आमचे उमेदवार पडले. ”

“ आता ही कॊंग्रेस नावाची व्यक्ती कोण ? “

“अहो तो एक प़क्ष आहे आमच्या विरोधातला. त्यांच्यातल्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ह्या सुपारीमॆनने आमची हक्काची मराठी मते फ़ोडली व कॊंग्रेसला विजय मिळवुन दिला.”

“ मगाशी तर म्हणालात की विरोधीवाल्यांचे नेते तुम्ही आहात म्हणुन ... ”

“ अहो तो मुद्दा वेगळा, ते आमच्या विरोधातले नेते, थोडक्यात ते सत्ताधारी व आम्ही विरोधक”

“ओह्ह, आय सी. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या सुपारीमॆनने तुमची हक्काची मराठी मते फ़ोडली व त्यामुळे कॊंग्रेस जिंकले. पण ही हक्काची मराठी मते तुमच्याकडे पुर्वी असण्यामागे व आता फ़ुटण्यामागे काही खास कारण ?”

“ त्याचं असं काही खास कारण नाही.”

“ खास नसले तरीही काही तरी कारण असावे असा माझे डायग्नॊस्टिक सांगते. असो, आपण ह्यावर जरा सविस्तर बोलु म्हणजे एकेक गोष्टी स्पष्ट होतील.”

“ अहो त्याला बारामतीच्या काकांची फ़ुस आहे व कॊंग्रेसची सुपारी आहे म्हणुन तो आम्हाला नडतो व आमचे उमेदवार पाडतो.”

“ आता हे बारामतीचे काका कोण ? माझा गोंधळ वाढत चालला आहे.”

“ ते महाराष्ट्राच्या राजकारणातले भिष्मपितामह, अख्खे राजकारण ह्यांच्याभोवती फ़िरते. हे इतर वेळी लोकांना सल्ले द्यायचे, आश्वासने द्यायचे व एखाद्याचा गोड बोलुन घात करण्याचे काम करतात. ह्या काकांचे महत्व प्रचंड आहे, त्यांच्याशिवाय इथे पानही हलत नाही.”

“ ओह; आय सी. अजुन एक प्रश्न. २-३ वर्षामागे तुमच्याच भागातला एक तरुण त्याच्यावर काका अन्याय करतात, दुर्लक्ष करतात वगैरे मुळे मानसिक त्रास होतो अशी तक्रार घेऊन आला होता. तो कोण आणि सध्या काय करत असतो ? “

( २ मिनीटांची निरव शांतता, कार्यकारी संपादक उठुन बाहेर जातात, मिलिंद “हॆलो हॆलो” करत कोप-यात जातो, दादुमहाराज अस्वस्थ होतात. )
“ तो मुद्दा वेगळा आहे आणि महत्वाचा तर अजिबातच नाही, ते काका वेगळे आहेत. आपण हा मुद्दा इथेच सोडुन देऊ हेच बरे कारण त्याने केस कॊम्पिकेटेड होईल.”

“ ओह्ह, ओके. हरकत नाही.”

“ हुश्श्श्श्श “

“ ओके ! म्हणजे आता आपण सगळे संदर्भ पुन्हा एकत्र करु, मी त्याची नोट बनवुन घेतो म्हणजे मला ह्या डेटाचे ऎनालिसीस करता येईल. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एका पक्षाचे राजकारणे नेते आहात तुमचे कार्यकर्ते निवडणुका लढवतात व त्यात पडतात. तुम्ही स्वत: लढत नाही पण तरीही तुमचा पराभव होतो. ह्यामागचे कारण एक सुपारीमॆन असुन त्याला कॊंग्रेसनामक एका पक्षाची सुपारी आहे, ह्या सुपारीमॆनला प्रेरणा आहे ती बारामतीच्या काकांची. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतो. करेक्ट ? “

“ ऎब्सोल्युटली राईट डॊक्टर, तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले सगळे काही.”

“ पण ह्यात त्या दुस-या काकांचा व त्या तरुणाचा काहीही संबंध नाही, करेक्ट ? “

“ नाही, गोंधळ होतो आहे. त्या तरुणाचा व ह्या सुपारीमॆनचा संबंध आहे.”

“ हे पहा हे फ़ारच गोंधळाचे होते आहे, मगाशी म्हणालात त्या काकांचा संबंध नाही. आता म्हणत आहात की सुपारीमॆन आणि तो तरुण ह्यांचा संबंध आहे. मग अशावेळी ते काका काय करतात सध्या ? “

“ खास असे काही नाही, पण जाऊ दे ते महत्वाचे नाही. पण तुम्हाला माझी समस्या बरोबर कळाली असे मला वाटते.”

“ एक मिनीट, जरा थांबा ! हे सर्व फ़ारच गोंधळाचे आहे. एक काम करु, मी आता तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित ऎनालिसीस करतो. आपण उद्या भेटु.”

“ धन्यवाद डॊक्टर, मी उद्या ह्याच वेळी येतो.”

*********************************************************

( दादुमहाराज व त्यांची सेना जाते व डॊक्टर पुढच्या पेशंटला आत बोलावतात.)

“नमस्कार, तुम्ही कोण व काय करता ? "

“नमस्कार, मी विरोधी युतीमधला नंबर २ चा नेता. मी नेहमी निवडणुका लढवतो व जिंकतो, ह्यावेळी लढलो नाही पण हरलो. आमच्या प़क्षाचे उमेदवारही लढले व पडले ...”

( एकदम जोरदार धप्पकन आवाज येतो.)

आतला पेशंट दार उघडुन बाहेर येतो व ओरडतो “ अरे पळा पोट्याहो, हे डॊक्टर बेणं चक्कर येऊन पडुन राहिलं बे. कोणीतरी खायला आणा बे काहितरी.”

त्याबरोबर बाहेर जमलेले इतर हरिदास साठवले, विजय खातु, देवदास कदम, अनिल देशमुख, अजयसिंह कोयते-पाटील असे नेते पळत येतात व एकमेकांना इथे पाहुन चक्रावुन जातात.

- समाप्त -

Thursday, September 17, 2009

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ...
( तसे पाहिले तर हा मजकुर वाचायचे काही कारण नाही, ऑलरेडी वाचला असल्यास ( तुमच्या जिवनातल्या अनेक दुर्भाग्यांपैकी एक ) दुर्भाग्य म्हणुन सोडुन द्या Wink )

* क्युबिकल मेकओव्हर कॉम्पिटिशन :
तुम्ही कंपनीत कामाला जाता की नाही, राहु द्यात आपण नुसतेच कंपनीत जातो असे म्हणु, कुणावर कशाला "काम करण्याचा " आरोप करायचा नाही का ?
तर असो. तुम्ही कंपनीत गेल्यावर ( फ़ुक्कटचे इंटरनेट वापरणे, फ़ोन करणे, गप्पा मारणे वगैरेंसाठी सर्व सोयींनी युक्त अशी जी जागा असते त्या ) "क्युबिकल" मध्ये बसता की नाही ?
इमानदारीत व्यवस्थित बसत असाल तर तुम्ही ह्या स्पर्धेला पात्र धरले जाल. ऑफीसमध्ये नुसतेच पोरी फिरवण्याचे धंदे करणार्‍यांनी जर "सैफ अली खान " ह्याचे सर्टिफिकेट आणले तर त्याचाही विचार केला जाईल.

ज्यामध्ये तुम्हाला तुमचे क्युबिकल एक विशिष्ठ थीम घेऊन सजवायचे होते, काहितरी देखावा तयार करायचा होता ( म्हणजे रोज आपण नुसतेच काम करतो आहोत हा देखावा उत्स्फुर्तपणे तयार करतो तो नव्हे, काहितरी वेगळा हवा होता). आपल्याकडे गणपतीला कसे लहान लहान पोरांना नाराज होऊ नये म्हणुन आपण लुटुपुटीच्या स्पर्धा घेतो तर हा त्यातलाच एक भाग, फक्त इथे "कमी पगारवाढ" हा इश्श्यु महत्वाचा होता. ह्याची सुरवात आधीपासुनच झाली होती, रोज आम्ही काम केल्याचा देखावा तयार करायचो मग शेवटी बॉसने एक दिवस "पगारवाढ दिल्याचा" नुसताच देखावा तयार करुन दाखवला व आम्हाला धोबीपछाड घातली. असो, सगळ्याच गोष्टी काढायची ही वेळ नव्हे.

डेकोरेशनसाठी वापरलेली थीम ( उर्फ संकल्पना ), एकुण सजावट, नाविन्य, खर्च्,मेहनत आदी गोष्टी विचारात घेऊन ( व आपल्या कंपुमध्ये कोणकोण आहे हे पाहुन ) बक्षिस जाहीर होणार होती. ( थोडक्यात काय तर कंपुबाजी एक वैश्विक जीवनशैली आहे, चालायचेच ).
सर्वात पहिल्यांदा आम्ही काय केले तर जी काही "ऑर्गनायझिंग कमिटी" होती त्यांना १००० शब्दांचा नियम आणि कायदे यांच्याविषयी अनेक चौकश्या करणारा एक मोठ्ठ्या ई-मेल ( सीसी : एच आर मॅनेजर ) पाठवला. त्यांनी आत्तापर्यंत नियम असे काही बनवलेच नव्हते कारण असे काही खरोखर करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसावी बहुतेक, त्यांचाच मग घाबरुन "२ दिवसात सर्व डिटेल्स पाठवतो" असा सर्वांना ई-मेल आला व नंतर जेव्हा खरोखर मेल आला तेव्हा भेंडी त्यांनी आमच्याच मेलमधल्या ८०% शंका "नियम" म्हणुन वापरुन टाकल्या होत्या ( तर ह्यातुन आपण काय शिकलो की साहित्यचौर्य हा केवळ आंतरजालाचाच प्रॉब्लेम नाही, ते कोठेही होऊ शकते).

एखादा १००० शब्दांचा लेख अथवा काथ्याकुट लिहायचा असता किंवा एखाद्या संवेदनाशील विषयावर मोठ्ठ्या भिंगाचा चष्मा घालुन व कपाळाला आठ्या घालुन समिक्षा वगैरे करायची असती तर हा आमच्या डाव्या हातचा मळ होता, पण इथे मामला कठिण होता. मग आम्ही मदतीसाठी मिपाकरांना साद घातली आणि बघता बघता अनेक कल्पना आल्या. प्रतिसाद आणि आयडिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद ( अ‍ॅड्या, राज्या, टार्‍या आणि धम्या तुम्हाला नंतर बघतो साल्यांनो Wink ).
त्यातुन आम्ही एक "सहजरावांनी" सुचवलेली थीम निवडली व पेपरवर्क सुरु केले ( ह्यालाच आमच्या रुममेट्सनी "तुम्ही फक्त कारणे शोधा **साठी " साठी असे म्हणले, पर्याय नाही, जनहितार्थ काही करायचे म्हणले की अशी टिका सहन करावीच लागते ...)

आता माझी थीम तर फायनल झाली होती की "एक मॉडर्न खेडे व एक मेट्रोसिटी" दाखवुन नव्या भारताचे चित्र मांडायचे. मग त्यानुसार नेटवर भरमसाट सर्फिंग करुन काही मॉडेल्स फायनल केली. शहरासाठी भरपुर काही मिळाले पण खेड्यासाठी काय दाखवावे ह्यावर आमचे गाडे पुन्हा आडले, पुन्हा सर्वांना खरडीद्वारे साद घातली व पुन्हा मिपाकरांचे भरभरुन रिप्लाय आले ( पण ह्याच दरम्यान कुठल्यातरी नतद्रष्टाने "मिपाकरांच्या खरडवह्यातल्या खरडींची संख्या" मोजुन सर्वात जास्त टीपी कोण करतो ह्याचा कौल घेतला, पाहुन घेतो रे, पुढचा लेख येऊदेत तुझा, नाय "गल्लत होते आहे" ह्या शिर्षकाखाली १००० शब्दांचा वाघासारखा प्रतिसाद लिहला तर दुसर्‍या आयडीने लेखन करेन).
सर्व काही आवश्यक माहिती मिळाली, मॉडेल्स ( फॅशन टिव्हीवाल्या नव्हे, डेकोरेशनच्या ) ही फायनल झाल्या, मटेरियलही येउन पडले ( ते कोणी आणले ह्याच्या फुक्कटच्या टांभारचौकश्या ( कॄपया "ट" च्या ठिकाणी "च" असे वाचावे) करु नयेत, अपमान होईल). केव्हा, कुणी, काय , कसे आणि किती ( हे सर्व प्रश्न थर्मोकॉल मॉडेल्सशी निगडीत आहेत ह्याची आवश्य नोंद घ्यावी ) ह्याचेही प्लानिंग झाले व युद्धाला तोंड फुटले...

ऑफीसमध्ये कामाच्या वेळात बसुन जर मी थर्मोकॉल-वर्क करत बसलो असतो तर माझ्या बॉसला झीट आली असती व त्याने एक तर मला थर्मोकॉलच्या भिंतीत चिणुन मारले असते वा स्वतः थर्मोकॉलच्य गोळ्या खाऊन आत्महत्या केली असती म्हणुन मी हे काम घरी करण्याचा निर्णय घेतला. घरीही परिस्थीती फार वेगळी नव्हती, आमच्या रुमवर असे काही काम करणे ह्याची तुलना ओसामा बिन लादेनच्या गुहेत "आंतरराष्ट्रिय दहशतवादाचे उच्चाटन" अशी चर्चा घडवुन आणणे किंवा प्रविण तोगडिया / वरुण गांधीबरोबर बसुन "मदरश्यांना वाढीव अनुदान" ह्यावर उहापोह करण्यासारखे आहे. तरीही आम्ही हे अवघड शिवधनुष्य पेलले व स्ट्रॅटेजी तयार करुन त्यानुसार वागण्यास सुरवात केली ( ह्यात २-३ दिवस रुममध्ये अपशब्दांचा वापर कमी करणे, स्वतःचा लॅपटॉप स्वखुषीने दुसर्‍यांना वापरण्यास देणे, वेळप्रसंगी स्वतः ऊठुन चहा वगैरे करणे, विकांताच्या नाष्टा/चहा/आदी पदार्थांचे बिल भरणे वगैरे वगैरे गोष्टी येतात. असो, जास्त खोलात शिरण्याची आवश्यकता नाही).

शेवटी आमच्या ह्या स्ट्रॅटेजीला बळी पडुन बहुतेक बाबीत माणसाशी साधर्म्य असणारा माझा एक मित्र मदतीला तयार झाला. पण हे घडत असताना त्याने निवडणुकपुर्व युती करताना जशी शिवसेना अनंत नाटके करते व रोज उठुन आपल्या युतीतल्या पक्षाला शिव्या घालते तसा "देखावा" त्याने २ दिवस सादर केला, पण माझ्यासमोर भाजपासारखाच इतर काही पर्याय नसल्याने मी आपले शांतपणे त्याचे नखरे ऐकुन घेतले व शेवटी त्याला "थर्मोकॉल कापायच्या" कामाला बसवले. ही एक अभुतपुर्व घटना होती, ह्या मित्राने ह्यापुर्वी डास, ढेकुण आणि कमीत कमी मित्रांची इज्जत ह्याशिवाय इतर काही कधीच कापले नव्हते. वास्तविक पाहता हे त्याचे कामच नव्हे कारण त्याचे कुठुन न कुठुन परशुरामाशी, खंडो बल्लाळाशी आणि बाजीप्रभु देशपांड्यांशी नाते लागत असल्याने त्याला जिभेचा दांडपट्टा फिरवणे एवढेच माहित. असा हा मित्र चक्क बसुन थर्मोकॉल कापत आहे हे दॄष्य पहायला फ्लॅटवरची अवघी मित्रमंडळी लोटली होती. सगळे एकत्र जमणे ह्या योगायोगाचा हा दुसरा प्रसंग, पहिल्या वेळी मी जेव्हा परदेशवारीनंतर बॅगेतुन शिवास रिगलची कुपी ( अ‍ॅड्या, कसा आहेस रे ? ) बाहेर काढली होती तेव्हा हाच सीन घडला होता, त्यानंतर पुन्हा तशी "शनी-मंगळ युती"नाही घडली.
ह्या दरम्यान आम्ही दोघांनी मिळुन आख्खा फ्लॅट थर्मोकॉलमय करुन टाकला होता, जिकडे नजर जाईल तिकडे थर्मोकॉल, सकाळी हापीसात जातना बुट घालायचा म्हणाला तर त्यातुन आहे १२५ ग्रॅम थर्मोकॉलचे तुकडे बाहेर काढा, फॅन लावला की उडणार्‍या थर्मोकॉलबरोबर झिम्मा खेळा आदी प्रकारांनी आमच्या इतर रुममेट्सच्या डोक्याला व्यवस्थित शॉट लागला आहे ह्याची खात्री करून घेतली. पुढे हे प्रकरण एवढे वाढले की एक दिवस खुद्द आम्हाला रात्री ( १ वाजता ) जेवताना मी "बटाट्याची भाजी" खातो आहे की "थर्मोकॉलची भाजी" खातो आहे हेच कळेना.

शेवटी (सरकारस्थापनेवेळेस येतात तशा ) अनंत अडचणींना फाट्यावर मारुन आम्ही कसेबसे एकदाचे सर्व होमवर्क पुर्ण केले व तो सर्व कच्चा माल ऑफीसमध्ये डेकोरेशनदिवशी व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करुन घेऊन गेलो ( पण त्या गडबडीत कंपनीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असते ते " आयडेंटि कार्ड " सोईस्कर विसरलो होतो हा भाग अलहिदा ). ते बॉक्स पाहुन आमच्या कलिग्सना झीट यायचीच बाकी होती, मी आल्याआल्या फटाफट "असेंब्ली सिक्वेन्सच्या प्रिंट्स" काढुन आमच्या टिममध्ये वाटल्या व त्यांनाही आता सर्व कच्चा माल असेंबल करुन फायनल डेकोरेशनच्या लुकमध्ये बदलवण्याच्या कामाला लावले. आमच्या बरोबर असलेल्या काही आकर्षक गोष्टींमुळे ( कॄपया फोटो मागु नयेत ) अनेक स्वेच्छेने मदत करणारे स्वयंसेवक मदतीचा हात घेऊन पुढे आले व पाहता पाहता ६ तासात "डेकोरेशन रेडी" झाले ...!!!
हे पहा ते डेकोरेशन :








डेकोरेशनची थीम :
त्याचे नाव मी "इंडिया : फ्युचर इज हियर " असे दिले होते. ह्यत मी एक सर्वसोईसुविधायुक्त असे स्वयंपुर्ण आदर्श खेडेगाव व सर्व निर्यातप्रधान वस्तुंचे उत्पादन करणारे महानगर अशा २ गोष्टींचा सेट-अप लावला होता
मी "स्वयंपुर्ण खेड्यामध्ये" दाखवलेल्या गोष्टी म्हणजे एक मस्तपैकी शेत व ते ही "देशमुख फार्म" ह्या नावाचे, एक मंदिर, काही घरे, पिण्याच्या पाण्याची टाकी, एक शाळा, एक दवाखाना, पंचायत समितीचे कार्यालय, व्यवस्थित आखलेले रस्ते, भरपुर हिरवळ, बायोगॅस प्लँट, कन्युनिकेशन टॉवर्स वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक असे ट्रॅक्टर, बैल, व्यक्ती आदींचे कटाआउटसयोग्य ठिकाणी लावले होते.
मॉडर्न शहर दाखवताना मी त्यात आयटी पार्क, ऑटोमोबाईल कंपन्या, आर & डी सेटप्स, इस्रो वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक आणि आवश्यक म्हणुन दळणवळणाची सुविधा देणारे फ्लायओव्हर्स, एक्स्प्रेस हायव्हेज, मेट्रो रेल्वे, विमानतळ आदी गोष्टी दाखवल्या होत्या ...

मॉरल : शेवटी जेव्हा पहाणीसाठी "परिक्षक" येणार होते तेव्हा त्यांना २ मिनीटात आपली थीम व त्याचे महत्व सांगायचे होते.
मी सांगितले की " शहरांचा विकास होतोय ह्यात वादच नाही, भारतीय शहरे सध्या नुसतेच भारतासाठी महत्वाची नसुन आख्ख्या जगासाठी माहितीची आणि तांत्रिक सेवेचे हब्स झाली आहेत.
पण एवढेच संपुर्ण नाही, आज भारतीय खेडीही अशीच स्वयंपुर्ण झाली तर तिथला माणुस नोकरीसाठी उगाच शहराकडे धाव घेणार नाही सध्या प्रमुख्य समस्या असलेली अस्ताव्यस्त आणि गलिच्छपणे विस्तारणारी शहरे आपोआप सुधारतील ...
भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वरील २ गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत, अन्यथा संतुलन बिघडुन जाईल व सर्व व्यवस्था कोलमडुन पडेल ...
( नंतर लोकांनी येड्यासारख्या टाळ्या वाजविल्या पण त्यात काही विषेश नाही. असो. )

तर अशा प्रकारे "आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ...."

उपसंहार :
फोटो व वृत्तांत द्यायला ( आमच्या ख्यातीला अनुसरुनच ) बराच उशीर झाला व त्या दरम्यान बर्‍याच घटना घडुन गेल्या. त्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा :
(ता.क. : खाली उल्लेख झालेली अलमोस्ट सगळीच पात्रे (शब्दश: घेतले तरीही हरकत नाही) ही "मिसळपाव.कॊम" वर लेखन करतात (असे तेच म्हणतात ) त्यामुळे ब-याच जणांना हे आऊट ऒफ़ कंटेक्स्ट वाटु शकते )
  1. आमच्या अक्षम्य दिरंगाईवर खवळुन "नंदनशेठनी" त्यांच्या इथुन प्रकाशित होणार्‍या एका "सॅन डियेगो ट्रिब्युन" ह्य नियतकालीकात " एसी व पीसी वाल्यांचा क्युबिकल डेकोरेशनचा माज ..." ह्या शिर्षकाखाली समस्त व्हाईट कॉलर जॉब वाल्यांना ४ खडे बोल सुनावणारा अग्रलेख लिहला.
  2. "अवलियाशेठ"नी आम्ही दाखवलेल्या मॉडेलमध्ये मंदिरावर "भगवा ध्वज" नसल्याच्या निषेधार्थ आंतरजालीय भगव्या आघाडीला हाताशी धरुन आंतरजालेय मोर्चे आणि निषेधसभा घेतल्या. पुण्याच्या पेशव्यांनी २ दिवस अनेक वेबसाईट्सची बँडविड्थ अडकवुन ठेवल्याच्या बातम्या आहेत.
  3. विजुभाउ, अदिती, टिंग्या आदी धर्मनिरपेक्ष लोकांनी गावामध्ये चर्च आणि मशिद का नाही म्हणुन धरणे धरल्याचे समजते. तसेच आम्हाला घेराव घालण्याचा त्यांचा मनसुबा बोलुन दाखवला. श्री. टारझन ह्यांनी स्वखुषीने आमच्या संरक्षणाची जबाबदारी उचलल्याचे समजले.
  4. गावामध्ये बार न दाखवुन "दारुबंदी" सारख्या अनिष्ठ प्रथांना थारा दिल्याच्या निषेधार्थ राजे व अ‍ॅडी जोशी ह्यांनी रास्तारोको केल्याचे समजते.
  5. धमाल मुलगा ह्यांनी आपल्या घरावरच "देशमुख फार्म" अशी पाटी लावल्याचे चित्र स्थानिक दैनिकात छापुन आले.
  6. बिपीन कार्यकर्ते ह्यांनी पुढच्या भारत भेटीत "आदर्श नगर" ला भेट देऊन तिथे एक कट्टा घेण्याचा मनसुबा व्यक्त केला. नेहमीप्रमाणे निखील देशपांडे हे बिकांना सहमत होते.
  7. पराची ह्या गावात नेटकॅफे कितपत चालेल व सुम्दर कन्या किती आहेत ह्याची चाचपणी सुरु केल्याचे समजते ...
  8. फोटोची चौकशी करण्यासाठी अनेक व्यनी केले गेल्याने "सहजरावांचा" ह्या वर्षीचा "व्यनी कोटा" संपल्याचे समजते, त्यांनी आता दुसर्‍या खात्यासाठी मिपा व्यवस्थापनेकडे अर्ज केल्याचे समजते.

असो, तुर्तास इतकेच ...

ता.क. : सदर डेकोरेशन ला "तृतीय क्रमांकाचे पारितोषीक" मिळाले :)

Monday, July 27, 2009

परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?"

आहे.

“महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“
असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो.

“महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “
हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. आता त्यांना हुशार आणि पब्लिकची नाडी बरोबर ओळखणारे निर्मातेही समजण्यास प्रत्यवाय नसावा कारण मराठी माणसाच्या मनाचा नेहमीच हळवा कोपरा राहिलेला महाराजांचा विषय निवडुन त्यांनी “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” ह्या चित्रपटाची निर्मीती केली.




“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा एक उत्कृष्ट, चांगला आणि गाजलेला चित्रपट आहे का ?”
एका शब्दात अगर वाक्यात हे सांगणे कठिण आहे. “एखादा चांगला आणि उत्कृष्ट चित्रपट हा गाजेलच असे सांगता येत नाही तसेच एखादा भयंकर गाजलेला चित्रपट हा उत्कृष्टच असेल असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही” हा चित्रपटसॄष्टीचा मुलभुत नियम आहे, तोच इथे चपखल लागु होतो. हा चित्रपट भयकंर गाजला आणि पब्लिकला आवडला हे सुर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे, सादरीकरणही भव्य आहे ह्यातही वाद नाही मात्र मला हा चित्रपट चांगला किंवा उत्कृष्ट वाटला नाही.
मात्र हा चित्रपट एका हुशार माणसाने ( पक्षी : महेश मांजरेकर ) बनवलेला अतिशय धंदेवाईक आणि सरळसरळ भावनांना हात घालुन मराठी माणसाला चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी झालेला एक गाजलेला चित्रपट आहे हे मात्र तेवढेच निर्वीवाद सत्य आहे. असो.

“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ही नक्की कशाची कहाणी आहे ? नक्की कुणावर फ़ोकस करुन हा चित्रपट पुढे सरकरतो ? “
ही कथा आहे एका न्युनगंडाने पिचलेल्या आणि मुंबईतुन हद्दपार होण्याच्या भितीने आत्मविश्वास गमावुन बसलेल्या व आपल्या प्रत्येक अपयशाचे दुसयाच्या कर्तुत्ववानपणावर आणि कष्टावर फ़ोडणा-या एका प्रातिनिधीक मध्यमवर्गीय पापभिरु मराठी माणसाची म्हणजे दिनकर भोसले यांची.
ऒफ़ीसमध्ये, बाजारात, रस्त्यावर, घरी, दुकानात असे पदोपदी अपमान सहन करुन राहणारे दिनकर भोसले, उत्तम मार्क असुन स्वत:च्या मुलाला एका स्वत:च्या मित्राच्या कॊलेजात पैसे देण्याची ऐपत अथवा तयारी नाही म्हणुन इंजिनीयरिंगची ऎडमिशन घेऊन देऊ न शकलेले दिनकर भोसले, मराठी आडनावावे सिनेसृष्टीत अडचण होते अशी स्वत:च्या मुलीची मुक्ताफ़ळे हताशपणे ऐकणारे दिनकर भोसले, स्वतःसाठी एक शर्ट विकत घेण्यासाठी अ‍ॅरियर्सची वाट पहाणारे दिनकर भोसले, ऑफीसमध्ये आपल्या साहेबांचा जाच अकारण सहन करणारे दिनकर भोसले, दररोज घरात विवीध कारणांवरुन आपल्याच बायकोचे टोमणे ऐकुन घेणारे व त्यावरुन तिच्याशी वाद घालणारे दिनकर भोसले.
पण बाहेरच्या जगाचा राग आपल्या अमराठी भाडेकरुंवर अकारण काढणारे हेच ते दिनकर भोसले, दु:ख आणि अपमान दारुच्या नशेत विसरायला एका मद्राश्याच्या बारमध्ये जाऊन अकारण आरडाओरडा आणि अरेरावी करणारे हेच ते दिनकर भोसले, स्वतःच्या अनावश्यक मस्तीमुळे त्याच बारमधुन मार खाऊन बाहेर पडणारे व नशेत बरळत स्वतःच्या घरच्यांना त्रास देणारे हेच ते हेच ते दिनकर भोसले.

"सिनेमाचे मध्यवर्ती कथासुत्र काय आहे ? "
ती आहे एक झुंज, २ असमान पातळीवर असणार्‍या व्यक्तीमत्वांची.
सोशीक, पदोपदीच्या अपमानाने पिचुन गेलेल, आत्मविश्वास हरवुन बसलेले दिनकर भोसले आणि स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय यंत्रणेला खिशात घालणारा, अत्यंत धुर्त आणि मस्तीखोर असा गोसालिया बिल्डर.
गोसालियांचा दिनकररावांच्या ऐन मोक्याच्या जागी असलेल्या राहत्या घराच्या जागेवर डोळा असतो, त्याला तिथे एक कमर्शियल कॉंप्लेस उभे करायचे असते. पण भोसले ती जागा सोडायलाअ नकार देतात व त्याच्या अमिषाला भिकही घालत नाहीत.
ह्या सर्वांमुळे पेटुन उठलेला गोसालिया व आपल्या निर्णयावर ठाम असणारे भोसले ह्यांची झुंज हे मध्यवर्ती कथासुत्र ...

"मग ह्यात शिवाजी महाराजांचा कुठे संबंध येतो ?"
दारुच्या नशेत जेव्हा दिनकररावांवर आपल्या अपमान आनि कुचंबणेच्या आठवणींच्या सहस्त्र इंगळ्या जेव्हा डसतात तेव्हा ते कंत्रोल सुटुन ह्या सर्वांचे खापर आपल्या "मराठीपणावर ( पक्षी : मराठी म्हणुन जन्म घेतल्यामुळे सोसाव्या लागणार्‍या यातनांवर ) " फोडतात व "मला मराठी असल्याचे लाज वाटते" हे वाक्य ओरडुन ओरडुन सांगतात तेव्हा रायगडावरच्या राजदरबारात बसलेल्या महाराजांच्या कानावरचे कल्ले रागाने थरथरुन उठतात. ज्यांना सुखाने जगता ह्यावे म्हणुन आपण ज्या हिंदवी स्वराज्याच्या अट्टाहास केला तोच मराठी माणुस आज आपल्याला "लाज वाटते" असे म्हणतो हे पाहुन महाराजांच्या संतापाला सीमा रहात नाही व ते ह्याचा जाब विचारायला दिनकर रावांकडे निघतात व कथेत "शिवाजी महाराजांचा प्रवेश" होतो.

"महाराजांच्या येण्याने असा काय फरक पडतो ? "
महाराज दिनकर भोसल्यांचे ब्रेनवॉशिंग करतात व त्याचा खचलेला आत्मविश्वास पुन्हा जागॄत करतात, त्याला हिंमतीने लढायला उद्युक्त करतात, मराठी माणसाने पुन्हा एकत्र येऊन आत्मविश्वासाने उभारले पाहिजे व हिंमतीने संकटाचा सामना केला पाहिजे हा विश्वास त्याच्यात जागवतात. अजुन बरेच काही काही म्हणतात पण मुळ सुत्र तेच त्यामुळे इतकेच ...

" मग नक्की काय बदल होतो भोसल्यांच्यात व त्या परिस्थीतीत ? "
स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि हिंमत परत मिळवलेले भोसले सर्वच पातळ्यांवर आपल्या हिंमतीचे प्रदर्शन घडवतात व यश मिळवतात. मग ते मुलाच्या कॉलेजचे अ‍ॅडमिशन असो, वा मुलीचे सिनेमातले करियर मार्गी लावणे असो, आपल्या साहेबाला त्याची जागा दाखवणे असो, पैशाला चटावलेल्या महानगरपाहिकेतल्या शासकिय अधिकार्‍यांची चुक त्यांना कठोरपणे दाखवुन देऊन स्वतःचे काम करुन घेणे असो, वा गोसालियाच्या नाकावर टिच्चुन दुसर्‍या एका मराठी बिल्डरकडुन त्याच जागेवर स्वतःला हवे तसे आणि स्वतःचेही हित पहाणारे कॉप्लेक्स उभारणे असो ह्या सर्व परिस्थीती यश हे दिनकर भोसल्यांचेच असते.
मधल्या काही पटकथेच्या मागणी असणार्‍या घटना रुढीनुसार घडुन शेवटी आपल्याला हवा तसा गोडगोड शेवट होतो व भोसले "मला मराठी असल्याचा गर्व आहे" ह्या वाक्याला एक प्रतिष्ठा मिळवुन देतात ...

"मग हा एवढा चांगला विषय हाताळणारा चित्रपट मला भरकटलेला आणि तद्दन गल्लाभरु का वाटला ? "
सांगतो, सिनेमाच्या सुरवातीपासुन दिनकर भोसल्यांचे जे "अपमान सहन करणे" दाखवलेले आहे ते अत्यंत बटबटीत आणि बेसलेस आहे, एवढा अपमान कोणी अकारण करत नसतो व कोणी केला तर समोरचा सहन करत नसतो, सहन करण्याला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाही, असल्या नेभळट आणि हतभागी माणसाची समाजाला अजिबात गरज नाही. इथे अनावश्यकरित्या अपमानांचे उदात्तिकरण करुन जनमानसाच्या भावनेला हत घालल्याचे व त्या पेटवण्याचा प्रयत्न सुरवातीच्या काही घटनातुन होतो.
ठिकठिकाणी अपमान सहन करणारे दिनकर भोसले मात्र जेव्हा बारमध्ये जातात तेव्हा एवढा कमालीचा माजोरडेपणा, भांडखोरपणा अणि मस्तीखोरपणा का करतात ह एक प्रश्नच आहे ? त्याचे समर्थन कसे होऊ शकते ?
शिवाय जेव्हा महाराजांचा शुभ-आशिर्वाद आणि भेट म्हणुन भवानी तलवार मिळते तेव्हा ह्याच भोसल्यांचे रुपांतर एका सुपर हिरोत होते व रॉबीनहुडसारखी अचाट, अतर्क्य, न पटणारी कॄत्ये करु लागतात. हा काय मुर्खपणा ? ज्या घटना पटणे शक्य नाही किंवा लौकिक अर्थाने शक्य नाहीत त्या ते सहजपणे चुटकीसरशी पार पाडतात ?
महानगरपालिकेचे मदमस्त अधिकारी एका भाषणाने ( किंवा सडेतोड बोलण्याने ) सुधारणे व त्यांनी लगेच इमानदारीने काम करणे, शौर्य पुरस्कार मिळालेला एक पोचलेला पोलीस अधिकारी केवळ शुटिंग चालु आहे म्हणुन भोसल्यांकडुन केल जाणारा अपमान सहन करणे , सरकारात मंत्री असलेल्या एका मंत्राच्या कॉलेजात अ‍ॅडमिशनसाठी म्हणुन भोसल्यांनी त्याला भेटणे व त्याला बोलण्यात गुंतवुन मोबाईलवर त्याचे शुटिंग घेऊन त्याचे फुटेज मिडियाला देणे व मंत्र्याची हकालपट्टी होणे, मुख्यमंत्राने साळसुदपणे "मला असल्या व्यक्तींबरोबर काम करण्यापेक्षा सत्ताच नको " असे बाळबोध विधान करणे , मुलीच्या करियरसाठी भोसल्यांनी एका अमराठी निर्मात्याला भेटणे व त्याला ४ शब्द सुनावणे व त्यामुळे त्याचा कायापालट होऊन त्याने मुलीला साईन करणे व स्वतः मराठी असल्याची कबुली देत स्वतःचा हापीसात मुर्खासारखा मराठीपणाचा डांगोरा पिटणे, एका सराईत गुंडाचा कायापालट केवळ काही प्रसंगामुळे व वाक्यामुळे होणे, ऑफीसमध्ये स्वतःच्या साहेबाला कसेही बोलुन त्यांचीए प्रतारणा करणे व स्वतःला हवी तिथे सही मिळवुन घेणे, शेवटच्या फायनल फायटिंग सीनमध्ये गोसालियावर भवानी तलवारीने वार करणे व इतर ३-४ जणांना असेच सहजपणे कापणे , आपसुकच मिळालेल्या प्रसिद्धिचा फायदा उठवण्यासाठी मुख्यमंत्रांना भेटुन निवडणुक लढवण्याबरोबरच मंत्रीपद मागणे, इत्यादी इत्यादी ....
का हो, ह्या घटना अत्यंत बालीश, बाळबोध आणि हास्यास्पद व तसेच "गल्लाभरु" आणि केवळ टाळ्या मिळवण्यासाठी केल्यासारख्या वाटत नाहीत का ?
माझ्या मते इथे सिनेमा घसरला व क्वालिटी हरवुन बसला ...

" मग पाहण्यासारखे आहे तरी काय नक्की ? "
येस्स, नक्कीच पाहण्यासारखे आहे व शिवाय त्यातुन बोध घेण्यासारखेही बरेच काही आहे.
खासक्रुन महाराजांचे सुरवातीचे काही डायलॉग्स बरेच काही सांगुन जातात. सर्व व्यवसाय परकीय ( पक्षी : अमराठी ) व्यक्तींने बळकावले ह्याचे खापर त्यांच्यावर न फोडता तुम्ही स्वतः झटुन कामाला लागले पाहिजे, कसलेही काम करण्याची लाज नाही वाटली पाहिजे, " आमची कुठेही शाखा नाही" ह्याचा अभिमान व वाटता लाज वाटुन व्यापाराचा विस्तार केला पाहिजे, "वेडात मराठी वीर दौडले सात" नव्हे तर "वेडात मराठी वीर दौडले एकसाथ" हे झाले पाहिजे असे मोलाचे संदेश महाराज दिनकररावांना व प्र्यायाने आपल्याला देतात.
हे डायलॉग्स लिहणार्‍या कलाकाराला सलाम, फारच उत्तम जमले आहेत ...
शिवाय महाराजांच्या आयुष्यात त्यांना आलेल्या अडचणींचा सामना त्यांनी धिराने व आपल्या चातुर्याने कसा केला व त्याचा आजही कसा उपयोग होऊ शकतो हा संदेशही हा चित्रपट नक्की देतो ...
"मराठी वाटण्याची लाज न वाटता" असे काम करा की "मराठी असल्याचा अभिमान ( इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि चुकीचा आहे असे आमचे मत आहे ) वाटायला हवा " हा फार मोलाचा संदेश हा चित्रपट देतो ...

"तांत्रिक बाबी, सादरीकरण आणि कलाकारांच्या पर्फोर्मन्सबद्दल काही ... "
काही तुरळक आक्षेप सोडले तर तांत्रिकदॄष्ट्या भव्यदिव्य असा हा सिनेमा आहे. बहुतेक सर्व कलाकारांचे काम उत्तम आहे, सचिन खेडेकरने उभारलेला दिनकर भोसले मस्तच. मात्र त्यांच्या पत्नी असलेल्या "बांधेकरवहिनी" उगाचच अनावश्यक बेअरिंग घेऊन अख्ख्या चित्रपटात वावरल्याने त्यांचा आक्रस्ताळा अभिनय अंगावर येतो. महेश मांजरेकर आणि सिद्धर्थ जाधव आपापल्या ठिकाणी उत्तम. मकरंद अनासपुरेचा रायबा असा विनोदी का दाखवला हे कळाले नाही,त्याच्या शैलीला अनुसरुन त्याला संवाद देताना म्हणींचा अतिरेक झाल्याने घासात खडा लागावा असे ते टोचते. भरत जाधवाचा शाहीर पहाणे हा मात्र अत्याचार आहे, दुसरा कुणीही चालला असता, केवळ स्टारडम आणायचे म्हणुन त्याला वापरणे साफ फसले.
आता महत्वाचे म्हणजे तो बहुचर्चित आणि भव्यव्दिव्य असा "एक करोड रुपयांच पोवाडा" ...
माझ्या मते शुद्ध मुर्खपणा कारण तो जेवढा जमायला हवा तेवढा अजिबात जमला नाही. आयुष्यात मी पाहिलेल्या अनेक "अफजलखानाच्या वधा"च्या प्रसंगातला सगळ्यात फालतु/बेताबेताचा/फसलेला प्रयोग ह्या सिनेमातला, ह्यापेक्षा पुण्यातल्या गणेशोत्सवात मस्त जमतो हा प्रसंग डेकोरेशन म्हणुन. आता त्यासाठी १ करोड कुठे आणि का घातले हे काही कळाले नाही. त्य पोवाड्यातले काव्य अप्रितम पण ते भरत जाधवांच्या साजातुन ऐकताना सर्व मज्जा निघुन गेली, उदेश उमप हा एक मस्त ऑप्शन होऊ शकला असता ...

" हा सिनेमा नक्की काय सांगतो व आपल्यात काय बदल घडवायला प्रवॄत्त करतो ? तो का पहावा ?"
मुळात ही कहाणी आज जरी दिनकर भोसल्यांची वाटत असली तरी ही गाथा आहे शतानुशतके चालत आलेल्या मराठी माणसाची, त्याच्य मनोवॄत्तीची, त्याच्या लढ्याची व त्याच्या यशापयशाची ...
आपला स्वाभिमान आणि हक्क अबाधित राखण्यासाठी लढलेल्या, झुंजलेल्या, शत्रुच्या नाकावर टिच्चुन यश मिळवणार्‍या अशा थेट ज्ञानोबा माऊली, तुकोबांपासुन ते शिवाजी महाराजापर्यंतच्या, लोकमान्य टिळकांपासुन ते बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसुर्य सावरकरापर्यंतच्या, यशवंतराव चव्हाणांपासुन ते सीडी देशमुखांपर्यतच्या व कालच्या बाळासाहेब ठाकर्‍यांपासुन ते आजच्या राज ठाकर्‍यांपर्यंतच्या अनेक महान मराठी व्यक्तीमत्वांच्या लढाऊपणाचा वारसा आणि आत्मसन्मानाचे बीज आपल्यापर्यंत आणणार्‍या एका क्षात्रतेजाची ...
परिस्थीती जरी बदलत असली तरी समस्या त्याच आहेत, मराठी माणुसही तोच आहे त्याच्या लढाऊपणा आणि हक्कासाठी कुणाविरुध्दही उभारण्याचे सिंहाचे काळीज बरोबर घेऊन. मराठी माणसाचा आत्मसन्मानही तोच आहे, त्याचा कणखरबाणाही अजुन तसाच आहे," मोडेन पण वाकणार नाही " हे अजही मराठी माणुस अभिमानाने म्हणतो व त्याप्रमाणे वागतोही.
फक्त काही काही वेळा काळाच्या जादुमुळे म्हणा अथवा निसर्गचक्राला अनसरुन म्हणा हे "मराठी स्फुलिंग" राखेच्या ढिगार्‍याखाली दबले जाते व त्याचे "तेज" कमी होते, ह्याचा अर्थ ते विझले असा होत नाही, आता त्याला जरुर असते ती कुणीतरी एक "जादुई फुंकर" मारण्याची, त्याने सगळी धुळ उडुन जाईल व मराठी कर्तुत्वाचे क्षात्रतेज पुन्हा तळपुन उठेल ....
पुन्हा एकदा " मी मराठी असण्याचा अभिमान वाटतो" हे वाक्य मोठ्ठ्या अस्थेने उच्चारले जाईल ...

इतिहासात अनेक लोकांनी हे फुंकर घालण्याचे काम केले, बरीच नावे मी वरच्या परिच्छेदात घेतली, बहुसंख्यही राहुन गेली.
पण आजच्या काळात हेच काम " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा सिनेमा करतो असे आमचे मत आहे म्हणुन प्रत्येकाने हा सिनेमा जरुर पहा असे तळमळीने वाटते ...
तेवढ्या एकाच बाबीसाठी बाकी सर्व गोष्टी आणि चुका माफ ...

धन्यवाद ...!!!!

Tuesday, June 30, 2009

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....


टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही.

"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म,
संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" -
इति : एक आंतरजालीय मित्र
"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर
घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई
"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन
आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र
"समोर दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे
भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" -
इति : बाबा
" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला
जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र
"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु
आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका
" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का
? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी
" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर
गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.
" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा
आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र

??
????
म्हणजे काय ?

म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ? मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?

तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे. लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या.
पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्‍याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती.मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ...
म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो....

आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो.
मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले.पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते.आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात ....
माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ?

तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्‍या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्‍यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?

लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्‍याच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्‍याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्‍यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.
पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते.मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही...

देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो.
आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही.
जातायेताना रस्त्यावर दिसणार्‍या कोपर्‍याकोपर्‍यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत.मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ?
देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ?पण,पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्‍यावरच्या दिसणार्‍या समाधानातच मला बर्‍याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते...

आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्‍या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते.
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्‍याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ?पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा.तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ...

खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?
कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ?
आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ?
रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे.
कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ?
असो.
अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?
कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ...

थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...
चालायचेच ...!!!!

धन्यवाद ...!!!
जाता जाता : ह्याच अनुषंगाने मेघना आणि संवेद ह्या दोघांचेही पोस्ट आणि त्यावरची चर्चा वाचण्यासारखे आहे.
सध्या "मिसळपाव.कॉम"वर ह्याच लेखावर घडत असलेली चर्चा आपल्याला
इथे पाहता येईल ...

Thursday, June 25, 2009

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२

टीप : ह्या लेखात कसलेही साहित्यीक मुल्य वगैरे सापडणार नाही, वेळोवेळी मनात आलेले व्यक्त/अव्यक्त भाव शक्य तितके शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी जमेल तितकी टवाळकी केली आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो.

या आधीचा भाग आपल्याला इथे पहायला मिळेल .....

*******************************************************

समोरच एका टेबलावर एक मस्त "हम २ हमारे २" वाले कुटुंब बसले होते, त्यांची ऑर्डर अजुन आली नव्हती त्यामुळे त्यांचा मस्त टाईमपास चालु होता. ते २ छोटुले मस्तपैकी (काटेरी चमच्याने) अपडाथपडी खेळत होते, त्याआधी बहुतेक त्यांनी "नॅपकिन्सची सुलभ कस्पटे" हा छोटासा वर्कशॉप केला होता असे दिसते आहे. कारण त्याचे छिनविछीन्न अवशेष टेबलावर दिसत होते. नवरा-बायको दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालुन बसले होते, बहुतेक एकमेकांना "समस" करत असावेत, सॉफ्टवेअर इंजिनीयर असावेत लेकाचे, समोरच बसलेल्या व्यक्तीशी पिंग करुन बोलणे ही तिकडचीच सवय.

एका मोठ्ठ्या टेबलावर एक मस्तपैकी "कॉलेज ग्रुप" बसला होता, बहुतेक पार्टी असावी अन्यथा एका दमात एवढे लोक (स्वखर्चाने)"पिझ्झा हट"ला येणे शक्य नाही. त्यांच्यातला "होस्ट" मी लगेच ओळखला, कारण त्याच्या चेहर्‍यावर जे बॉसने हापीसात अनैतिक काम करताना पकडल्यासारखे भाव असतात ते लगेच ओळखु येतात. मित्रांना पार्टी देणे ह्या प्रसंगाची तुलना एक तर "पगार देऊन स्वतःला शिव्या देण्यासाठी एखादा कोल्हापुरी माणुस नोकरीला ठेवणे" अथवा "उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे" ह्यांच्याशीच होऊ शकते, धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही असा हा पार्टीचा प्रकार आहे. गॄपमधल्या काही मुलांचा नैसर्गिक गुणधर्माने पोरींवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न चालु असल्याचे दिसले, बहुदा मग त्यासाठी काही पाचकळ विनोद ( पक्षी : जे आम्ही करतो ते ) करुन हास्यफवारे उडवणे चालु होते. बहुतेक मुलीही आपले (कॄत्रीम)सौंदर्य बेदाग कसे राहिल ह्याची काळजी घेताना दिसत होत्या, हो ना, नाहितर तोंडाने त्या पिझ्झाच कोरडा तुकडा खाऊन नंतर सारखे इवलाश्या नॅपकीनने व (आपल्याच) कोमल हातांनी सारखे आपलेच नाक, कपाळ व गाल साफ करणे ह्याला काय म्हणावे ?
छे, बर्‍याच आठवणी जाग्या होतात अशी दृष्ये दिसली की, अशा पार्ट्यांवर एक स्वतंत्र लेखच टाकु असे म्हणत एक दिवस माझा ट्रकभर लेख लिहतो असे ( नुसतेच ) म्हणणारा डाँ. न्या. खैरनार होणार असे दिसतेय.

तिकडे एका जराश्याच लांब असलेल्या टेबलावर "३ देवियाँ किंवा चार्लिज एंजल्स" बसल्या होत्या. त्यातली एक मुलगी खुपच सुंदर आहे असे आमच्या मित्राचे मत झाले. ( अर्थात त्याच्या सुंदरतेच्या संकल्पना ह्या "बिपाशा बासु, कोयना मित्रा, राखी सावंत, तनुश्री दत्ता" इथंपर्यंतच मर्यादीत असल्याने मला त्याचे जास्त आश्चर्य वाटले नाही. अर्थात कुणाला कशाचे आकर्षण वाटावे ह्याचेही काही लिखीत नियम नाहीत, हवे असल्यास तुम्ही "शायनी आहुजा"चे उदाहरण घेऊ शकता). मात्र त्या ज्या पद्धतीने समोरचे अन्न खात कम चिवडत होत्या ते मात्र नक्की रोचक होते, काट्यावर (वजनाच्या नव्हे, तो विषय वेगळा. इथे फोर्क ह्या अर्थाने ) अडकवलेला पिझ्झा आपल्या मानेची, हाताचे, डोळ्यांची आणि केसांची किती कमाल हालचाल करीत किती नाजुकपणे खावा ह्याचे ते एक उत्तम उदाहारण होते. मला त्यातल्या एका मुलीची दर घासानंतर समोरच्या आरश्यात पाहुन केलेली "लिपस्टीकची अ‍ॅडजेस्टमेंट" हा प्रकार फारच मनोरंजक वाटला, किती जपतात हो मुली ह्या लिपस्टीकला, पण आवडले ( लिपस्टिक नव्हे तर तो प्रकार, अर्थात लिपस्टिक आवडले असल्याचे आम्ही कबुल करणार नाही हे ही आहेच). खरेतर " ((दिवसा)महत्वाची कामे करताना) लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की.

तेवढ्यात आमच्या मित्राने "अरे, हिला पाहिलेस का ? ( येडाच आहे लेकाचा, पाहिल्याशिवाय काय आम्ही सोडतोय का ? ) मी ना हिला क्ष ठिकाणी य बरोबर पाहिले होते. च्यायला बहुतेक आपल्याच ब्लॉकमध्ये रहाते" अशी बहुमोल आणि बिन-उपयोगी माहिती दिली.आता माझ्या ह्या रुममेट मित्राबद्दल ४ शब्द सांगणे महत्वाचे आहे ( ओ अ‍ॅडी जोशी, तुमच्या रुमवर झोपायला जागा आहे ना ? मी ८ दिवस तिकडे रहायला येईन म्हणतो ). तो उभा असलेल्या ठिकाणीपासुन १ किमी त्रिज्येच्या परिसरात असणारी प्रत्येक पोरगी त्याने कुठेना कुठे कुणा ना कुणा बरोबर पाहिलेली असते असा त्याचा दावा आहे व दिवसातुन कमीत कमी २० किमी गाडी पळवणे हा त्याचा प्रण आहे. थोडक्यात आख्ख्या बेंगलोरमध्ये त्याने "क्ष" मुलगी व ती पण "य" ह्या ठिकाणी पाहिली नाही ह्या दोन्हीही शक्यता शुन्य आहेत कोणी असा दावा करत असल्यास सरळसरळ तो झरदारी अमेरिकेला मारतात तशा बिनबुडाच्या थापा मारतो आहे हे लक्षात घ्या. आम्हाला फक्त काळजी जेव्हा तो स्वतःच्या लग्नासाठी "मुलगी पहायला" जाईल त्या वेळची आहे कारण खासकरुन आपण "वेगळ्याच कारणासाठी" मुलगी पहात आहोत हे जर त्याच्या लक्षात नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. असो, खुप विषयांतर ( केले किंवा ) झाले.

इथे आम्हाला एक सुपरिचीत दृष्यही दिसले, आपल्या पुण्यात कसे सणासुदीला लोक पारंपारिक पोषाख घालुन, नटुन थटुन सहकुटुंब सहपरिवार असे जे.एम. रोड अथवा तत्सम ठिकाणी हॉटेलात जेवायला जातात व "पंजाबी डिशेस" खातात तसेच इथे एक "कुटुंब" पिझ्झा पार्टी झोडायला आलेले दिसले. कुटुंब हे अक्षरशः कुटुंब होते, म्हणजे पार आजोबा-आजींपासुन ते नातवापर्यंत. काळ फारच वेगाने बदलत चालला आहे खरा, बेंगलोरसारख्या सायबर सिटीत तर फारच वेगाने. आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते, आमची अपेक्षा होती की ते राईस-रस्सम सारखे मस्तपैकी काला करुन खाणार. आज्जीची थोडी पंचाईत झाल्यासारखी दिसत होती पण नातु तिला मदत करताना दिसला व हे दॄष्य फारच आवडले , खरेतर हेवा ही वाटला, खोटे कशाला बोला ?त्यांना घेऊन येणार्‍या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्‍यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही.

बाकी काय इतर दृष्ये नॉर्मल होती, बहुसंख्य पिझ्झा खाण्याच्या कम (लिमीटेड) एकांतात गप्पा मारण्याच्या हेतुने आलेली कपल्स होती, ते आपल्या सुखात दंग होते. त्यांच्या भावनांचा लिखाणाद्वारे बाजार मांडुन त्यांच्या ज्या काही असतील त्या भावनांचा अपमान करण्याचा माझा इरादा विचार नाही ( न जाणो त्या घोळात मी ते अनुभव माझ्या शब्दात लिहताना गाफीलपणे एखादे नाव घेउन बसायचो व नंतर पंचाईट होऊन बसायची ).
बाकी इतर "आम्ही पिझ्झा हटमध्ये येऊन पिझ्झा खातो, आय कॅन अ‍ॅफोर्ड इट ...!" असे आव आणुन बसलेले महाभागही होते, ह्या भावनाही पटकन चेहर्‍यावरुन व बॉडीलँग्वेजवरुन वाचता येतात. वारंवार वेटर्सना त्रास देणे, मोबाईल खेळवत बसणे, चेहर्‍यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.त्यांचेही काही खास नाही.
अजुन एक म्हणजे "जाहिरातीतील कुटुंबे" सुद्धा दिसतात, वयाच्या मानाने जरा जास्तच अवखळ आणि अल्ट्रा मॉडर्न लहान मुली, त्यांचे डोक्यात जाणारे फालतु लाड व कौतुके, जणु त्या लहान मुलीची मोठ्ठी बहिणच आहे असा आव आणणार्‍या व इतरांचे लक्ष वेधुन घेण्याच्या पराकाष्ठा करणार्‍या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या त्यांच्या आया व त्यांचे कॄत्रीम लाडेलाडे बोलणे आणि हे सर्व हतबलतेने अथवा कौतुकाने पाहणारा त्यांचा हतबल अथवा मुर्ख नवरा ...
चालायचेच.

मात्र एका गोष्टीचे जरुर कतुक करु वाटते ते म्हणजे तिथल्या "टेक अवे काउंटरवरचा डिलेव्हरी बॉय ( तोच तो , आम्हाला फुक्कट पेप्सी दिलेला)", ज्या चपळाई व सहजतेने तो बर्‍याच गोष्टी अगदी सफाईने हाताळत होता ते पाहुन कौतुक वाटले. रांगेत उभे असलेल्यांच्या ऑर्डरी देणे, नव्या ऑर्डरी घेणे, फोनवरची ऑर्डर व त्यांची लफडी ( पक्षी : आमच्यासारखी ) निस्तारणे, पैशाचे हिशिब संभाळणे, कुणालाच दुर्लक्षीत न करता सर्वांना महत्व देणे, कंटाळलेल्या एखाद्या लहान मुलीला फुगा फुगवुन देणे, जाणार्‍या येणार्‍या गिर्‍हाईकांना योग्य ट्रिटमेंट देत अभिवादन करणे ...
क्लासच, त्याचे जरुर कौतुक आहे...

एकंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वावरणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मनातल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...

जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे

" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,
पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."
बासच ...!!!!
शेवटी ( वाचकांच्या दृष्टीने काडीइतकी किंमत नसलेला ) आमचा पार्सल पिझ्झा आला व ते घेऊन आम्ही परत आमच्या फ्लॅटवर आलो ...

अवांतर :
जाता जाता पिझ्झा हट प्रशासनाला काही मुलभुत प्रश्न :
१. पिझ्झा हटमध्ये "इंग्रजी" न बोलल्यास शिक्षा म्हणुन पैसा डब्बल घेऊन पिझ्झाच्या बदल्यात आमटी-भात खाऊ घालण्याची शिक्षा आहे का ?
२. नोकरभरती करताना "त्यांचे बोलणे आम्हाला कळत नाही व आम्ही काय म्हणतोय ते त्यांना कळत नाही" अशी नॉर्थ्-इस्टची पोरं भरती करण्यामागचे रहस्य काय आहे (अर्थात माझा मुद्दा हा प्रांतिक विरोधाचा नाहीच )? कमीत कमी त्यांना स्थानिक भाषा अथवा कमीत कमी इंग्रजी/हिंदीचा स्थानिक अँक्सेंट यांचे ट्रेनिंग कधी देणार ? का ह्या सर्व गोष्टी आपल्या "ग्राहक समाधान व सोईसुविधा" ह्यांच्या कक्षेत येत नाहीत.
एक किस्सा : मागे पुण्यात असल्याच एका प्रकाराला वैतागुन आमच्या एका मित्राने त्या नॉर्थ-इस्टच्या मुलीशी चक्क शुद्ध मराठीतुन प्रश्नोत्तरे करायला सुरवात केली, तीने "तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही" हे सांगितल्यावर त्याने " बरोबर आहे तुझे, माझेही काहीसे असेच होते आहे" असे सुनावले होते ।
३ . गर्दीच्या वेळी दारात उभा असणारा पिझ्झा हटचा कर्मचारी हा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमला असतो की गोंधळ वाढवण्यासाठी ?कमीत कमी २ वाक्ये त्याला व्यवस्थित बोलता यावीत हे महत्वाचे नाही का ?

कैच्या कै अवांतर :
एका गोष्टीसाठी वाचकांची माफी मागतो, लिहण्याच्या ओघात "टवाळकी" मधुन मध्येच लेख "सिरीयस" कसा झाला ते कळालेच नाही. अर्थात माझ्या मते ह्यात चुक काहीच नाही, हा परफेक्ट शेवट आहे. पण जर कुणाचा अपेक्षाभंग झाला असेल तर माफी असावी ...
आजकाल बर्‍याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.असो.
धन्यवाद ..!!!

Monday, June 22, 2009

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....

.
आमचा एक अनोखा छंद आहे, गर्दीतला गडबडीत आणि धांदलीत स्वतःच्या विश्वात मग्न असणारा सामान्य माणुस न्याहाळण्याचा. आता ह्यात आम्ही स्त्री, पुरुष, लहान, थोर, गरिब , श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करीत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, थोडे थांबावे लागते, थोडा काळ व्यतीत करावा लागतो आणि मग इथे आम्ही आमचा छंद पुरवुन घेतो. अर्थात हे करत असताना समोरच्याला त्रास अजिबात त्रास होणार नाही अथवा अवघडल्यासारखे वाटणार नाही ह्याची पुर्ण काळजी आम्ही घेत असतो, हो ना, नाहितर "कसा टक लाऊन पाहतो आहे बघ मेला, घरात आई-बहिणी नाहीत वाटतं, मुडदा बशिवला ह्याचा ...." वगैरे मुक्ताफळे ऐकण्याची हौसही नाही व सोसही नाही.


गेल्या काही दिवसापुर्वी इकडे भयानक पाऊस झाला व तो ही विकांताला, त्यामुळे नेहमीचे व्यस्त कार्यक्रम सोडुन झक मारत घरातच बसावे लागले ( व रुममेट्सचे टोमणे ऐकुन न ऐकल्यासारखे करावे लागले ) . नेमका हाच मुहुर्त साधुन आमच्या कुक-बुवानेही मस्तपैकी टांग दिली , ऐनवेळी असा घोळ घालण्याच्या बाबतीत त्याने अगदी धोनीच्या हातावर हात मारला आहे . संध्याकाळच्या जेवणाचा काहीच सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे न दिसल्याने मी ( मनमोहनसिंग साहेबांसारखा ) सर्वसंमती होऊ शकणारा "पिझ्झा ऑर्डर करु" हा उपाय सुचवला, सहाजिकच पुढची सर्व कार्यवाही करण्याही जबाबदारी माझ्यावर आली. "३० मिनीटात पिझ्झा घरपोच" ह्या सुविधेला आम्ही फोन केला, त्यावरच्या सुंदर व मोहक ( आवाजाच्या ) कन्येने आमची सर्व माहिती व्यवस्थित विचारुन घेतली व शेवटी पडलेल्या आवाजात "पावसामुळे आम्ही होम डिलीव्हरी करणे तात्पुरते स्थगित केले आहे" असे अत्यंत दु:खद आवाजात आम्हाला सांगितले व रुममधले टोळभैरव पुढच्या कार्यक्रमाचा अंदाज आल्याने खदाखदा हसले . शेवटी त्या कन्येने अजुनच दिलगिरीच्या सुरात त्यांच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरवात केल्याने आता ही स्वतःच आपल्या रुमवर येऊन पटकन राईस्-रस्सम बनवुन देते की काय ह्या शंकेने घाबरेघुबरे होऊन आम्ही स्वतःच तिथे जाऊन ऑर्डर आणायचे ठरवले.

आता बाबासाहेब पुरंदर्‍यांच्याच भाषेत सांगायचे तर अर्जुनाच्या धनुष्यातुन सुटणार्‍या तीरांचा कहारीपणा घेऊन पाऊस संततधार कोसळत होता, रणदुंदभींच्या कल्लोळासारखाच पावसाचा व रस्त्यावर धावणार्‍या गाड्यांचा आवाज अवघे आसमंत भरुन टाकत होता, पोतराजाच्या कडाडणार्य आसुडासारखी वीज कडाडत होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने लख्खकन चमकत होती, नुकतीच जुलमी मोगलाईची टोळधाड येऊन गेल्यासारखे रस्ते शांत आणि निर्मनुष्य दिसत होते, सह्याद्रीच्या बेलाग कड्यावरुन बेदुंधपणे कोसणणार्‍या पाण्याच्या अवखळ लोटासारखे रस्त्यावरुन पावसाचे पाणी आपली वाट काढत मुक्तपणे वहात होते, (लाईट गेल्याने ) किर्र अंधार होता. अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी : रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली व औरंगजेबाच्या तंबुवर चमकणारा सोन्याचा कळस कापुन काढायला धावणार्‍या संताजी/धनाजींच्या अधिरतेने त्यांनी "पिझ्झा हट" ह्या गडाकडे सुसाटपणे धाव घेतली.
( हा हा हा, लै भारी वाटते असे लिहायला, आता बास झाले पण )

पोहचल्यावर आत गेलो तो ही ऽऽऽऽ गर्दी , पुण्याची शनिवार्-रविवारची चुल न पेटवण्याची परंपरा ह्यांनीही बरोबर उचलली आहे, त्यामुळे तिथे "अवघा हिंदु एकवटला ... च्च च्च .. अवघे जन एकवटले" असे झाले होते ( च्यामारी, सामना पेपर वाचणे जरा कमी केले पाहिजे ). थम्ब रुलप्रमाणे आमची जी ऑर्डर फोनवरुन घेतली गेली होती ती मध्येच पावसात विरघळुन गेल्याने इथपर्यंत पोहचली नव्हती, पिझ्झा हटवाल्यांनी अनेक मधुर शब्दांची पेरणी करत झालेली चुक मान्य करत लांबड लावायला सुरवात केली व वाट पहायची विनंती करायला सुरवात केली (बुद्धुच आहेत लेकाचे, असल्या पडत्या पावसात हातचे सोडुन पळत्याच्या पाठीमागे बाहेर निघुन जायला आम्ही काय तेलगु देसमचे नेते वाटलो की त्यांना ? ) . शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्‍यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ...

पुन्हा त्यांनी नमनालाच घडाभर तेल घालुन आमची "ऑर्डर घेतली" व आम्हाला एक कोपर्‍यात असणारा एक मस्तपैकी कोच दाखवला व तिथे बसुन वाट पहाण्याची विनंती केली. ( तिथे असलेल्या सुंदर कन्या पाहुन ) आमचा मित्र आमच्या आधीच तिथे पोहचला ( आणि सगळीकडचाच "चांगला व्ह्युव्ह मिळेल" अशी ) जागा पाहुन त्याने तिथे ठाण मांडले. आम्ही आपले मुंबईतल्या लोकलच्या चौथ्या सीटवर बसणार्‍या मनुक्षाचा अवघडलेलापणा घेऊन उरलेल्या जागेत बसुन घेतले.समोर पाहिले तर अनेक लोक दिसत होते ( हो हो, अनेक सुंदर कन्याही दिसत होत्या (कॄपया फोटोंचा आग्रह करु नये, अपमान होईल ) पण तो महत्वाचा मुद्दा नाही ) , आमच्या "व्यक्तिनिरीक्षणाची" हौस भागवण्याची सुयोग्य जागा ह्याहुन दुसरी सापडली नसती. आम्ही आपले स्वतःवरच " यही है राईट प्लेस ( राईस प्लेट नव्हे ) बेबी, आहा ..." म्हणत खुष झालो. मित्राची काळजी करण्याची गरजच नव्हती, "अशा ठिकाणी" कसा टाईमपास करावा हे त्याला सांगणे म्हणजे साबा करिमने गांगुलीला ऑफसाईडला गॅप कसा काढावा हे शिकवण्यासारखे आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो ....

* क्रमश : *
( आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही.

Monday, June 8, 2009

एंजल्स & डेमन्स ...

डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.

टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ... ***********************************************
चित्रपटची सुरवात होते ती २ अत्यंत वेगळ्या जगातल्या आणि वेगळ्या पातळीवरच्या घटनांमधुन, धर्म आणि विज्ञान ह्यातल्या महत्वपुर्ण घडामोडींवर प्रकाश टाकुन चित्रपट सुरु होतो.

रोममध्यल्या "व्हॅटिकन सिटी"मध्ये सध्या पदावर असलेल्या "पोप"चे निधन होते व त्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रथा पाळुन पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या "कॉन्क्लेव्ह" ह्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. जुन्या पोपचा वैयक्तीक आणि सर्वात जवळचा सेवक असलेला धर्मगुरु ज्याला "केमरलिंगो" ह्या नावाने ओळखले जातो तो कार्लो व्हेन्ट्रेसा ह्या विधीची सुरवात करतो. ह्या विधीसाठी संपुर्ण जगातुन ख्रिश्चन धर्माचे अत्युच्च असे १६५ कार्डीनल्स हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात, आख्ख्या जगभरातला मिडिया ह्या संपुर्ण विधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी रोममध्ये हजर असतो व त्यांना सोबत असते ती लाखो श्रद्धाळु ख्रिश्चन धार्मिक लोकांची.
ह्या घडामोडींपासुन अत्यंत दुर व अत्यंत तटस्थ अशा एका "सर्न (European Organization for Nuclear Researc)" नावाच्या जिनेव्हामधल्या संस्थेमध्ये मात्र वेगळीच धांदल उडाली असते. "हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शुन्यापासुन नविन काही ( Creation of Something from Nothing ) बनवणे शक्य नाही " ह्या संकल्पनेला तडा देणारे काम इथे चालु असते, शात्रज्ञ लिओनार्डो व्हेट्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "अँटीमॅटर" तयार करण्यात येतो, ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या "बिग बँग" प्रक्रियेतुन विश्व निर्माण झाले त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती.
ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतुन डॉ. व्हेट्रांची अत्यंत गुढ हत्या होते व हत्या करणारा खुनी बहुमुल्य आनि धोकादायक असे "अँटीमॅटर" त्याच्या सुरक्षा करणार्‍या कॅनिस्टरसह घेऊन तिथुन गायब होतो.

ह्या दोन्ही घटनांपासुन मानसीक व शरिरीकपणे अत्यंत दुर असलेल्या हॉवर्डमधील सिम्बोलॉजिस्ट ( मराठी शब्द ? ) व इतिहासतज्ज्ञ प्रा. रॉबर्ट लँग्डन यांना स्वीस गार्डकडुन ( व्हॅटिकन सिटीचे रक्षक ) "अत्यंत आणिबाणीची परिस्थीती" असे सांगुन तातडीचे बोलावणे येते.

इकडे व्हॅटिकनमध्ये दाखल झालेल्या कार्डिनल्सपैकी अत्यंत महत्वाचे आणि भविष्यातले पोप होऊ शकणार्‍यापैकी ४ कार्डिनल्सचे अत्यंत गुढ पद्धतीने "अपहरण" झालेले असते. अजुन एक गोष्ट म्हणजे सुरक्षेसाठी लावलेल्या एका कॅमेर्‍यामध्ये सर्नमधुन चोरी गेलेले "अँटीमॅटर" दिसलेले असतात. अपहरणकर्त्याने फोन करुन ४ कार्डिनल्सच्या दर तासाने एक ह्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिकस्थळी खुनाची व सर्वात शेवटी अँटीमॅटरचा वापर करुन संपुर्ण व्हॅटिकन नष्ट करण्याची धमकी दिली असते. अपहरणकर्ता स्वतःची ओळख "इल्युमिनाटी * ( खाली थोडे विस्तारीत स्पष्टीकरण देतो ) गटाचा सदस्य" म्हणजे "व्हॅटिकन चर्चचा महान,अत्यंत जुना परंतु ताकदवान आणि हुशार शत्रु" अशी करुन देतो.

मागण्या ???
मागण्या काहीच नसतात व काही तडजोड ही तो नाकारतो, त्याच्या मते जे चर्चने ४०० वर्षापुर्वी ४ शास्त्रज्ञांच्या हत्या करुन व त्यांच्या मॄतदेहाची सार्वजनिकस्थळी विटंबना करुन जे क्रौर्य दाखवले त्याचा हा सरळसरळ "सुड" आहे, सुड घेताना त्यात कसलीही तडजोड अथवा सौदा होऊ शकत नाही.

ह्याच परिस्थीतीची उकल करण्यासाठी, अपहरणकर्त्याचा व अँटीमॅटरचा शोध घेण्यासाठी प्रा. रॉबर्ट लँग्डन आणि सर्नमधील शात्रज्ञ "व्हिटोरिया व्हेट्रा" हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात. ह्या सर्व शोध सत्राची व व्हॅटिकनमध्ये घडणार्‍या इतर धार्मिक घटनांचे नेतृत्व स्वतः "केमरलिंगो" हा धार्मिक अधिकारी करत असतो.

आता सुरवात होते अनेक गुढ, धक्कादायक, अंगावर रोमांच आणणार्‍या घटनांना ....
रॉबर्ट लँग्डनच्या मते जर अपहरणकर्ते खरोखर इल्युमिनाटी गटाचे सदस्य असतील तर त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि ती काटेकोरपणे पाळण्याबद्दल इल्युमिनाटींची ख्याती आहे. ह्या जगाची निर्मीती "पंचतत्वांमधुन" झाली ह्यावर अत्यंत गाढा विश्वास असणारे‍या इल्युमिनाटी त्यांच्या संदेशात व कार्यक्रमात ह्या पंचतत्वांचा जरुर वापर करत असल्याने त्या दिशेने शोध घेतल्यास आपण नक्की त्यांना पकडु असे लँग्डनला वाटते. इल्युमिनाटींच्या पद्धतीनुसार ४ खुन व अँटीमॅटर्चा स्फोट ह विवीक्षित ठिकाणीच होणार व ते शोधण्यासाठी अपल्याला एक "कोडे सोडवावे" लागेल असा लँग्डनचा विश्वास असतो, एका खुणेवरुन दुसरी, त्यावरुन तिसरी असे शोधत जाऊन आपण त्या अपहरणकर्त्यापर्यंत जरुर पोहचु असे लँग्डन सर्वांना पटवुन देतो.


ह्या शोधसत्राचा पहिला दुवा हा "व्हॅटिकन अर्काईव्ह्ज"मध्ये असलेल्या महान खगोलतज्ज्ञ गॅलेलियोच्या "सत्याचा नकाशा (Diagramma della Verità : Diagram of Truth)" ह्या पुस्तकात मिळणार असल्याने सर्व नियम, रुढी, गुप्तता झुगरुन देऊन केमरलिंगो लँग्डनला ते पाहण्याची परवानगी देतात.त्यात मिळालेल्या कोड्याची उकल केल्यावर त्यांना खुनाच्या पहिल्या जागेचा अंदाज येतो व ते धावत तिकडे पोहचतात, पण इथे मात्र त्यांच्या शत्रुने त्यांच्यावर सरळसरळ मात केलेली असते. पंचतत्वांमधल्या पहिले तत्व असलेल्या "जमिन" याचा उपयोग करुन पहिल्या कार्डिनलची हत्या करण्यात आली असते व त्याचा मॄतदेह तिथे पडला असतो.
इथे असलेले "एंजल्सचे पुतळे" आणि "पंचतत्वे" ह्यांच्यातील संबंधच आपल्याला पुढचा दुवा देतील ह्या धारणेतुन लँग्डनचे शोधकार्य चालुच राहते ते मिळालेल्या संकेतांनुसार एका जागेवरुन दुसरीकडे धाव घेत असतात.मात्र त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही, अजुन २ कार्डिनल्सची पंचत्त्वांनुसार "हवा व अग्नी" ह्यांचा वापर करुन अत्यंत निर्घुण हत्या होते व खुनी पळुन जाण्यात यशस्वी होतो.
चौथ्या आणि शेवटच्या कार्डिनल बॉजियांना वाचवण्यात लँग्डन यशस्वी ठरतो मात्र अत्यंत धोकादायक असा खुनी आणि त्याच्याबरोबर असलेले "अँटीमॅटर" ह्यांचा अजुन अजिबात पत्ता नसतो, ते गुढ अजुन कायमच असते.

इकडे चर्चच्या रुढीनुसार नव्या पोपच्या निवडीसाठी आवश्यक असणारे "कॉन्क्लेव्ह" त्या ४ कार्डिनल्सच्या अनुपस्थिती सुरु झालेले असते व स्वतः केमरलिंगो सर्व परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याच्या व्हिट्टोरिया व्हेट्राबरोबर झालेल्या चर्चेत आलेल्या शंकानुसार मरण पावलेल्या पोपच्या शरिराची पुन्हा तपासणी करण्यात येते व इथे आश्चर्याचा धक्का म्हणजे हा पोप नैसर्गिकरित्या मरण पावला नसुन त्यांची हत्या झाली आहे असा निष्कर्ष निघतो. हे एकुण प्रकरण गंभीर आहे, इल्युनाटींचा अजुन पत्ता नाही, अँटीमॅटरचा धोका अजुन आहे ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन केमरलिंगो कॉन्क्लेव्ह चालु असलेल्या "सिस्टीन चॅपेल" इथे धाव घेऊन, परंपर मोडुन, विधी थांबवुन तिथे असलेल्या सर्व कार्डिनल्सना सध्या घडत असलेल्या घटनांची कल्पना देऊन विधी थांबवण्याची विनंती करतो. "देवावरची श्रद्धा मोठ्ठी की विज्ञानाचे अस्तित्व खरे ? संकटातुन तुम्हाला विज्ञान वाचवते की देवावरची श्रद्धा ? विज्ञान हे देवाच्या विरुद्ध आहे की ते परस्परांना पुरक आहेत ? न जाणो अजुन विज्ञान बाल्यावस्थेत असल्याने अत्यंत गहन असलेल्या देव आणि धर्माला समजण्यास नालायक ठरत असेल तर तो त्यांचा अक्षम्य गुन्हा मानायचा का ? ह्य विज्ञानप्रेमींना धर्माच्या प्रवाहात समावुन घेतले तर ते बरोबर नव्हे का ?" असे एक भावुक व तात्विक भाषण करुन तिथे जमलेल्या सर्व काडिनल्सना विधी थांबवण्यची व इल्युमिनाटीबरोबर ( विज्ञानप्रेमी ) समझोता करण्याची घोषणा करण्याची विनंती करतो. पण त्याच्या हाती निराशा पडते, देवाच्या ताकदीवर गाढ श्रद्धा असलेले व देवच आपले रक्षण करेल ह्यावर प्रगाढ विश्वास असलेले "स्कुल ऑफ कार्डिनल्स" आपला कॉन्क्लेव्ह हा विधी पुढे चालु ठेवतात ...

काही वेळानंतर खुद्द "केमरलिंगो"वर खुनी हल्ला होतो, करणारा त्याच्या जवळचाच माणुस निघतो व तो "इल्युमिनाटीचा हस्तक" आहे असे ठरवुन त्याला ठार मारले जाते, खुद्द केमरलिंगो जखमी होतो.
इकडे खुनावरुंन खुणा, दुव्यावरुन दुवे शोधत असलेल्या लँग्डनला अखेरीस येश मिळते. ते अँतिमॅटर हुडकण्यात यशस्वी ठरतात, ते अँटिमॅटर असलेले कॅनिस्टर त्यांना सापडते व खुन्याचाही बंदोबस्त होतो ....

पण इथे अजुन एक नवा टर्न ...
अँटिमॅटर संभाळनार्‍या कॅनिस्टरची बॅटरी फक्त ५ मिनीटे शिल्लक राहिली असते, ते संपल्यावर आतल्या अँटिमॅटरचा व बाहेरच्या मॅटरचा संपर्क होऊन एक महाविस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, हातात असतात फक्त ५ मिनीटे व पणावर लावले असते अख्खे व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्मातले सर्वोच्च अधिकारी, लाखो लोक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचा धर्मावरील विश्वास ...

ही आव्हान पेलायला उपस्थित असतात स्वीस गार्डचे काही कडवे रक्षक, प्रा. लँग्डन, व्हिट्टोरिया व्हेट्रा आणि स्वतः केमरलिंगो ....

पुढे ???
पुढे काय होते ???
अँटीमॅटर संभाळले जाते की त्याचा स्फोट होतो ? स्कुल ऑफ कार्डिनल्सचा पोपसंबंधी काय निर्णय होतो ? आत्त्तापर्यंत अखंड कष्ट व परिश्रमाची उच्च पातळी गाठलेल्या प्रा. लँग्डन आणि केमरलिंगो यांचे काय होते ?धर्मावरील श्रद्धेचा विजय होतो की विज्ञानातील सत्याचा ???

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थेटरमध्ये चित्रपट पहुनच मिळतील. आत्ता मी इथे काही लिहणे म्हणजे "मिस्टरी स्पॉईल" करण्यासारखे होईल, तेव्हा आपण हा चित्रपट जरुर थेटरमध्येच पहावा.
माझ्याकडुन इतकेच....

शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढीवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा , सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुम्दर मिश्रण असणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे "एंजल्स आणि डेमन्स ", जरुर पहा आणि कसा होता ते मला आवश्य कळवा ...
धन्यवाद ...!!!!

* इल्युमिनाटी :

हा ख्रिश्चनिटीमधल्या चर्चया विरोधात असणार्‍या काही कडव्या लोकांच्या म्हणजे मेसन्सच्या गटामधला एक लहान गट, प्रामुख्याने ह्या गटात त्या त्या काळातले महान शात्रज्ञ, शिल्पकार, कलाकार, तंत्रज्ञ लोक वगैरे असत. ब्रदरहुड ह्या अजुन एका चर्चविरोधी गटाकडुन मिळणार्‍या मदतीमुळे अनेक नव्या संकल्पना ह्या इल्युमिनीस्ट लोकांनी मांडल्या. बव्हेरियन राजाच्या आर्थीक मदतीचा स्त्रोत अखंड चालु असल्याने ह्यांनी बरेच संशोधनात्मक कार्यही केले.हे सर्व "विज्ञानवादी" लोक होते.मात्र ह्यांचे संशोधन हे "बायबलमधल्या संकल्पनांच्या विरोधात" गेल्याने व्हॅटिकन चर्चच्या रोषास हे इल्युमिनाटिस्ट बळी पडले, ह्यांच्यावर बंदी आली व सदस्यांचे प्रचंड छळ झाले व अनेक हत्याही झाल्या ..."गॅलालियो, केपलर, न्युटन,लिओनार्ड दा विंची, व्हिस्टन चर्चिल" वगैरे इल्युमिनीस्ट होते असा एक समज आहे ...


( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )