Thursday, February 28, 2008

मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल




आमचे अजून एक कुटुंब आहे, www.misalpav.com

यावर आम्ही अगदी मोकाट सुटलेल्या जनावरासारखे हुंदडत असतो कारण ते आमच्यासाठी जणू दुसरे घरच आहे। तर अशा या मिसळपाववर सध्या आपुलकी व कौटुंबिक भावना , अगदी घरच्यासारखा वावर व जशी आपल्याला आपल्या घराशी वाटते तशी पारवारिक ओढ या भावना वाढिस लागल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.....थोडक्यात काय तर , मिपा आता एक कुटुंब बनले आहे....

त्याच धर्तीवर माझा हा 'शेखचिल्लीची स्वप्ने ' पाहण्याचा प्रयत्न. समजा मी मिपा वरची कोणती दुसरी 'व्यक्ती' असतो तर काय केले असते याचे हे पूराण. याची प्रेरणा आम्हाला आमचे गुरु 'शिरीष कणेकर' यांच्या लेखनातून मिळाली. असो ......
यात कोणावरही मुद्दामून , तिरस्काराच्या हेतूने टिका केलेली नाही , फक्त मज्जा यावी म्हणून हा सगळा खटाटोप . तरी आपण सर्व सुज्ञ, माझा हा 'मुर्खपणा' आपल्या 'मिपा' चे 'धाकटे शेंडेफळ' समजून माफ करताल अशी अपेक्षा आहे....................

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते। 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती।वर्षातून एखादा दिवस तरी 'ह्याला माझा नमस्कार आहे, शतशा वंदन आहे, मी सांष्टांग नमस्कार घालतो' असे म्हणायचे टाळले असते।

पण मी 'तात्या' एवढा मोठा नाही ......
**************************************************************************************
मी जर "प्राजू" असतो तर सगळ्यांनी माझ्या वाढदिवसाला 'विश' केल्याचे लक्षात ठेऊन सगळ्यांना मस्त 'पार्टी' दिली असती [ त्यातल्या त्यात 'मिसळपाव' हा मेनू ठेवला असता] व 'पार्टी' झोडण्यात मग्न असलेल्या गाफील सदस्यांना पकडून 'एकरकमी कमीत्-कमी १० तरी नव्या चारोळ्या ' सुनावल्या असत्या ....

पण मी 'प्राजू' एवढा दिलदार व कवीमनाचा नाही.....

*************************************************************************
मी जर 'विनायक अनिवसे' असतो तर माझे नाव बदलून 'मी मराठी' ठेवले असते. एका नवीन 'मराठी भाषा पुनर्निमाण सेने' ची स्थापना केली असती. त्या सेनेचा जोरावर 'मुंबई' ही भारताची राजधानी व्हावी व भारताची राष्ट्रभाषा 'मराठी' व्हावी यासाठी अंदोलने केली असती. आपल्या बहूमताच्या जोरावर इथुन पुढे 'अमराठी लोकांना' मुंबईमध्ये प्रवेश करण्यास 'बंदी' असल्याचे विधेयक संमत करून घेतले असते।

याला जे लोक [भय्ये] विरोध करतील त्यांची माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'टकूरी' फोडण्यास मागे पुढे पाहिले नसते।
पण मी 'विनायक' येवढा 'कट्टार मराठीभीमानी' नाही ........
*****************************************************************************************
मी जर 'डांबीसकाका' असतो तर आपल्यामुळे धमाल, छोटा डॉन सारखी पोर बिधडायला लागली हे ऊमजून 'मद्यप्राशन' सोडून दिले असते. 'मद्यप्राशनविरोधी जनजागरण अभियान' चलू केले असते. अख्ख्या अमेरिकेत मी ' मद्यपानाचे तोटे व टाळण्याचे सहजसोपे मार्ग' या विषयावर परिसंवाद आयोजित केले असते.....
आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते।त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........
पण मी 'डांबिसकाकां' एवढा शौकीन नाही ......
************************************************************************************
मी जर 'धमाल मुलगा' असतो तर प्रथम माझे नाव बदलून 'ईब्लिस कार्टे' ठेवले असते. ठिकठिकाणच्या पोरांना पकडून 'जश्न - ए- बहार' चे बेत रचून ते तडीस न्हेले असते। 'डांबिसकाकांनां' च्या दारूबंदी अभियानात सामिल झालो असतो.मी 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती' यावर एक 'प्रेझेंटेशन दिले असते.
सरकारी हूकूम न मानता 'मार्च' मध्ये 'शिवजयंती' साजरी केली असती।
पण मी 'धमाल मुला' एवढा 'दिलखूलास नाही .......
***************************************************************************************
मी जर 'वरदा' असतो तर 'प्रेम म्हणजे काय?' ह्या वादात कधीतरी 'मुलांच्या' बाजूने विचार केला असता व 'प्रॅक्टिकल लाईफ' चा विचार न करता 'भावनेच्या' आधारे मुलांचे बरोबर आहे असा निर्वाळा दिला असता।
मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते व तेच वाचून मस्त ताईमपास केला असता। मी टाईमपास करण्यासाठी माझी बदली 'बेंगलोरला' करून घेतली असती......
पण मी 'वरदा' एवढा 'मॅच्युअर' नाही ........
********************************************************************************************
मी जर सकाळचा 'आपला अभिजीत' असतो तर नियमाने दर आठवड्याला "नव्या नव्या सिनेमांची परीक्षणे" लिहली असती.कोणता सिनेमा कुठे पाहण्याचा लायकीचा आहे याबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून 'भिकार सिनेमा' थेटरात पाहणार्‍या जनतेचे ऐसे वाचवले असते.मी 'तसल्या नजरा' सारखे लेख लिहून लोकात मस्त चर्चेचा बार ऊडवून मस्त मजा बधत बसलो असतो .....
पण मी 'अभिजीत' एवढा 'व्यासंगी व परिपूर्ण' नाही.......
**************************************************************************************
मी जर 'जुना अभिजीत' असतो तर दर १० दिवसाला माझे नाव 'अभिजीत , मोठा डॉन , जुना अभिजीत ' असे चेंज केले नसते।पुरंदर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'मिसळभक्षण यज्ञातून' वेळ काढून मिपा वर नवे नवे साहित्य प्रसवले असते....
पण मी 'अभिजीत' येवढा 'कट्टर मिसळप्रेमी' नाही ........
******************************************************************************************
मी जर 'स्वाती राजेश' असतो तर मस्तपैकी 'कूकिंग स्कूल' सुरु करून होतकरू लोकांना त्यांच्या जिभेचे चोचले पूरवण्यास मदत केली असती.आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता। कधीमधी मिपा परिवाराला आमंत्रीत करून मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातले असते.
पण मी 'स्वाती राजेश' एवढा 'सिद्धहस्त' नाही .....
**************************************************************************************
मी जर " केशवसुमार" असतो तर माझ्या 'विडंबनांचे एक पूस्तक' प्रकाशित केले असते व नंतर त्या पूस्तकातील कवितांचे पून्हा 'विडंबन' केले असते।
मी एखादे तरी विडंबन शेवटी 'केश्या , किश्या ' असे नाव न घालता लिहले असते व लोकांच्या आग्रहास्तव पून्हा ते अद्ययावत केले असते.....
पण माझ्यावर 'केशवकुमारां' एवधी 'सरस्वतीची कॄपा' नाही .....
*****************************************************************************************
मी जर खरच 'छोटा डॉन' असतो तर मिपाच्या कौतुंबियांचा मनाचा मोठेपणा लक्षात घेऊन लेखाच्या सुरवातीस "कोणाच्या भावना दूखावण्याचा हेतू नाही " अशी सूचना केली नसती.ऊलट आमचे कोण काय बिघडवणार अशी दर्पोक्ती केली असती.

आपले नम्र शेंडेफळ
छोटा डॉन .......................

बेंगलोर आख्यान ..... भाग १

आज बेंगलोरला येउन बरोबर ६ महिने पूर्ण झाले, खरचं केती लवकर निघून जातो ना काळ ? बिलकूल वाटले नाही की आपण येवढ्या सहजपणे ६ महिने पूर्ण करू म्हणून . वाटते आहे की आत्ताच कुठे आपण पुणे सोडून या दूरदेशी आलो आहोत. आजून त्या पुण्याच्या रम्य आठवणी मनात तशाच ओल्या आहेत. पण आता हळूहळू येथे स्थिरावर आहे. तसे आजच्या प्राकृत भाषेत सांगायचे म्हणल्यास मी आता 'अलमोस्ट सेटल ' झालो आहे. पण आता वाटत आहे की थोडे सिंहावलोकन करून पहावे गेल्या ६ महिन्याचे [ काय आहे , असे दमदार शब्द वापरल्याशिवाय लेख वजनदार होत नाही ] काही डोंबलाच सांगण्यासारखं घडलं नाही तरी "दिसामागे काहितरी (च) लिहावे " या आमच्या बाण्याला स्मरून हा लेख मी पुढे चलू ठेवतो ..........

तसे माझे 'बेंगलोरला' येणे अगदीच काही अनपेक्षीत असे काही नव्हते , कारण त्याच्या आधीच साधारणता २ महिने माझ्या मनात "पक्षांतराचा " विचार चालू होताच. तेव्हा मी काम करत असलेल्या पक्षात माझा 'दम घुट रहा था' . मला काही आंतरराष्टीय पातळीवर काम करण्याची संधी दिसेना आणि काही मोठे पद मिळण्याचे चान्सेस कमी होते [ आपले प्रमोशन हो ] कारण आमचा पक्ष [ म्हणजे कंपनी ] पडला फक्त राज्याच्या राजकारणातच समाधान मानणारा. मग त्यासाठी आम्ही ईतर मोठ्या व प्रस्थापित पार्ट्यांशी बोलणी चालू केली. पण हे सगळे आमच्या पक्षाच्या कार्यकारणीला अंधारात ठेउनच चालू होते. आमच्या पक्षांतर हेतूची कुणकुण आमच्या 'हाय कमांड' ला लागलीच आम्हाला 'मातोश्री' वर बोलावणे आले [ म्हणजे जनरल मॅनेजर च्या केबिनमध्ये ], त्यांनी अगदी प्रेमाने आमची चौकशी केली व आमच्यासाठी भविष्यात रचलेल्या योजनांची एक मस्त गोष्ट सांगितली. राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आम्ही पण त्यांच्या हो मध्ये हो मिळवली। पक्षाच्या कार्यकारणीच्या एका बैठकीत आमच्या 'साहेबांनी' आमची खूप स्तूती केली. पक्षाच्या बांधणीत , घडणीत व अडचणीच्या काळात आम्ही कशा महत्वाच्या भूमिका बजावल्या याचा त्यांनी पाढा वाचला. आम्हाला "कडवा, कडवट यंत्रसैनीक " असे बहूमानही बहाल करण्यात आले. पक्षात आमची व्यवस्थीत घेतली काळजी जाईल अशी ग्वाही आम्हाला देण्यात आली. पण परिस्थीती सुधारण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. आमची पक्षा कुचंबणा, अपमान [ म्हणजे खराच नाही , पण लिहावे लागतं ] चालूच होती. थोडक्यात सगळ्या चर्चा , बैठका ह्या 'बोलाचीच कढी व बोलाचाच भात ' आहेत हे मला उमजले .....

तेवढ्यात आम्हाला एका जागतीक पातळीवर काम करणाऱ्या एका मोठ्या पक्षाची ऑफर आली। हा पक्ष "जगातील सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल कंपनी " म्हणून ओळखली जाते. त्यांनी आम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणात संधी तसेच पक्षात महत्वाचे पद यासारख्या अनेक गोष्टी कबूल केल्या. अशा ह्या मान्यवर व जनतेमध्ये एक 'इमेज' असलेल्या जागतीक पक्षाच्या माध्यमा द्वारे जनतेची 'सेवा' करून चांगला 'मेवा' मिळवण्याचा संकल्प आम्ही सोडला . लवकरच आम्ही एका शूभमुहूर्तावर आमच्या सध्याच्या पक्षाच्या "सर्व पदांचा व सदस्यत्वाचा" राजीनामा देउन पक्षाला "जय महाराष्ट्र" ठोकला. त्यामुळे आम्हाला "उडाले ते कावळे, राहिले ते मावळे","गद्दाराला क्षमा नाही" अशे अनेक (????) बहूमान प्रदान करण्यात आले. पण आम्हाला जागतीक राजकारणाची स्वप्ने पडत असल्याने आम्ही त्याला भीक घातली नाही व बेंगलोरच्या दिशेने पहिले पाउल टाकले....
थोडे दिवस मस्तपैकी घरी आराम करून , मिळालेले "ऑफर लेटर" सगळीकडे मिरवून , तिथल्या स्थानिक दोस्तात नव्या कंपनीविषयी 'ढिगाने पुड्या "सोडून व शेवटी "आईवडीलांचे आशिर्वाद व श्री विठ्ठलाचे " दर्शन घेउन आमची स्वारी बेंगलोरच्या दिशेने कुच करण्यासाठी पुण्याच्या दिशेन रवाना झाली. पुण्यात आमच्या लिवलग मित्रांबरोबर २ दिवसाचे "जिवाचे पुणे" करून झाल्यावर सर्व मित्रांनी आमचे 'पार्सल' बेंगलोरला जाणाऱ्या गाडीत बसवून रवाना करून दिले .....


असा शेवटी 'रोजच्या भाकरी' साठी आम्ही आयुष्यात कधीही न पाहिलेल्या 'बेंगलोरच्या' दिशेने आमचा प्रवास सुरू झाला .......

Friday, February 22, 2008

"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............

* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो ....
* तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........
* तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........
* तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो .........
* तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो .......
* त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे हृदय बेपत्ता आहे .......
* जेव्हा तो आरश्यात पाहतो तेव्हा आरशाचे तुकडे तुकडे होतात कारण २ रजनीकांतांच्या मध्ये उभी राहण्याची आरश्याची हिंमत होत नाही ......
* जर 'ब्रेट ली' ताशी १५० किमी वेगाने चेंडू फेकत असला तरी रजनीकांत 'ब्रेट ली' ला त्यापेक्षा जास्त वेगाने फेकून देउ शकतो ........
* गणिती व्याख्येमध्या 'पाय' चा शेवटाचा अंक रजनीकांत आहे की ज्याला कधीच अंत नाही .....
* रजनिकांतला त्याचा शत्रू कुठे राहतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही पण तो कुठे मरणार आहे हे स्वता 'रजनीकांत' ठरवतो ..........
* कुठल्याही बंदूकीची गोळी त्याचे शरीर भेदण्यास समर्थ नाही पण तो आरामात गोळीचे २ तुकडे करू शकतो .....
* 'अंपगांसाठी असलेल्य पार्कींगच्या जागेचा' खरा अर्थ 'हा रजनीकांत चा एरिया आहे तेव्हा येथे पार्कींग केल्यास तुम्ही अपंग होण्याची शक्यता आहे' असा आहे........
* रजनीकांतच्या दिनदर्शीकेत १ एप्रील ही तारीख नाही , कारण त्याला कोणीच मुर्ख बनवू शकत नाही .........
* जर तुम्ही 'गूगल सर्च' मध्ये रजनीकांतचे 'स्पेलींग' चूकीचे लिहले तर 'तुम्हाला रजनीकांत म्हणायचे आहे का ?' ह्या संदेशा एवजी 'पळा , तुमच्याकडे अजून संधी आहे' असा सल्लावजक संदेश येतो ........
* एकदा 'किंग कोब्र्याने' रजनीकांत ला दंश केला , ५ दिवसांच्या मरणयातना भोगल्यानंतर 'किंग कोब्रा ' मरण पावला .......
* तुम्ही एका दगडात २ पक्षी मारत असाल तर तो एका पक्ष्याने २ दगड खतम करू शकतो .......
* आजचे सर्वोत्तम किटकनाशक ९९.९९% किटकांचा सफाया करण्याचा दावा करते, पण रजनीकांत ला जर कुणाला मारायचे असेल तर तो मरण्याची शक्यता केवळ १०० % च असते .......
* 'जागतीक तापमान वाढ ' ही संकल्पना खोटी आहे, एकदा रजनीकांतला थंडी वाजत असल्याने त्यानेच 'सुर्याचे' तापमान वाढवले होते ते आता तसेच राहिले आहे .....
* तो 'भिंगाच्या' साह्याने 'रात्री ' सुध्धा आग लाउ शकतो ........
* त्याला मानवी जीवनाबद्दल प्रचंड आदर आहे जोवर त्या त्याच्या मार्गाआड येत नाहीत .........
* त्याने एकदा जोराने आरोळी ठोकून 'अमेरिकन फायटर प्लेन' पाडले होते .........
* एका सर्वसाधरण बैठकीच्या खोलीत असणाऱ्या १२०० वस्तूंपैकी तो कुठल्याही एकाने तुम्हाला मारू शकतो , यात त्या खोलीचाही समावेश होतो .........
* असे म्हणतात की 'प्रत्येक यशामागे एक स्त्री असते" , तर "प्रत्येक मारल्या गेलेल्या माणसामागे एक आणि एकच रजनीकांत असतो" .........
* त्याला चालकाचा परवाना वयाच्या '१६ व्या सेकंदाला ' मिळाला , ज्यासाठी तुम्हाला आज १६ वर्षे वाट पहावी लागते ..........
* दुख्खाचे वर्गमूळ रजनीकांत आहे पण जर तुम्ही त्याचा वर्ग करायला गेलात तर त्याचा परिणाम फक्त आणि फक्त मृत्युच आहे .......
* जर तुम्ही त्याला " नो बडी इज परफेक्ट " हे वचन ऐकवले तर तो हा त्याचा वैयक्तीक अपमान मानून तुमच्यावर पुढील योग्य कारवाई करेल, त्याला तशी परवानगी आहे ........
* देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांत बर पृथ्वीवर राहणे परवडणार नाही.....
* जेव्हा तो व्यायामासाठी 'पुश-अप्स' काढतो तेव्हा तो स्वताला वर उचलत नसून जमीनीला खाली ढकलतो .....
* त्याच्या पळण्याचा वेग प्रचंड आहे, तो कुठल्याही वस्तू भोवती जोरात गोल पळून स्वताच्या 'पाठीला धप्पा ' देउ शकतो ....
* तो घड्याळ घालत नाही , कारण तो स्वता वेळ ठरवतो .....
* 'मोनालीसा' च्या चेहऱ्यावरचे जगप्रसिध्ध हास्य तीने जेव्हा 'रजनीला' पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटले ........
* त्याच्या घराला दारे/खिडक्या नाहीत , तो जाण्या-येण्यासाठी भिंतींचा वापर करतो ...........
* कॉफी करताना तो कॉफीची पूड दाताने बारीक करून ती स्वताच्या अंगातल्या गरमीने गरम केलेल्या पाण्यात टाकतो .........
* गूगल-सर्च मध्ये 'रजनीकांत मार खाताना ' ह्याशोधाचे "०" परिणाम येतात .....
* ईराकमध्ये कुठलेही अतिसंहारक शस्त्रे सापडली नाहीत कारण रजनीकांत चेन्नई मध्ये राहतो व ते भारतात आहे .........
* एकदा त्याने झोपेच्या गोळ्याची अख्खी बाटली खाल्ली होती , त्यामुळे त्याला थोडी पेंग आली ..........
* त्याच्या पेक्षा जोराने व लांबपर्यंत धावणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याचे 'सिनेमे '.........
* त्याच्या प्रत्येक पावलामुळे एक नवे वादळ निर्माण होते , अमेरिकत आलेली वादळे " कतरीना , रिटा " हा त्याच्या सकाळच्या "जॉगिंग" चा परिणाम मानला जातो .......

Saturday, February 9, 2008

"जनरल मोटर्स" विरूध्द " मायक्रोसॉफ्ट "

At a recent computer expo (COMDEX), Bill Gates reportedly compared the computer industry with the auto industry and stated, "If GM had kept up with technology like the computer industry has, we would all be driving $25.00 cars that got 1,000 miles to the gallon."
In response to Bill's comments, General Motors issued a press release

Stating:

"If GM had developed technology like Microsoft, we would all be driving cars with the following characteristics (and I just love this part, esp 7th point and 10'th point):
  1. For no reason whatsoever, your car would crash twice a day।
  2. Every time they repainted the lines in the road, you would have to buy a new car।
  3. Occasionally your car would die on the freeway for no reason। You would have to pull to the side of the road, close all of the windows, shut off the car, restart it, and reopen the windows before you could continue।
  4. Occasionally, executing a maneuver such as a left turn would cause your car to shut down and refuse to restart, in which case you would have to reinstall the engine.
  5. Macintosh would make a car that was powered by the sun, was reliable, five times as fast and twice as easy to drive - but would ! run on only five percent of the roads.
  6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light.
  7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying.
  8. Occasionally, for no reason whatsoever, your car would lock you out and refuse to let you in until you simultaneously lifted the door handle, turned the key and grabbed hold of the radio antenna.
  9. Every time a new car was introduced car buyers would have to learn how to drive all over again because none of the controls would operate in the same manner as the old car.
  10. You'd have to press the "Start" button to turn the engine off. "


MORAL OF THE STORY : - - Never undervalue the manufacturing & automobile industries