Tuesday, March 18, 2008

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

.
.
आता तसं पाहायला गेलं तर या विषयावर बऱ्याच रथी-महारथींनी आधी बरेच काही लिहून ठेवले आहे. आता त्यात वर मी हे पांढऱ्यावरचे काळे करणे म्हणजे "तळ्यात ओंझळीने पाणी टाकून त्याचा समुद्र बनवायचा प्रयत्न करण्यासारखे आहे. सर्वप्रथम मेघना त्यानंतर सामवेद यांनी बरेच काही लिहून "आपण का लिहतो ?" याचा अभ्यास केला अथवा आत्मपरिक्षण केले [ च्यायला शब्द बरोबर आहे ना ? नाहितर फुकट फटके पडायचे !!!. ] आता त्यानंतर आम्हाला कोणी "खो" देण्याची वाट न पाहता " मी का लिहतो याचे हे पुराण. तसे कुणी खो द्यायची वाट न पाहणे उत्तम कारण आपण तेवढे प्रस्थापित व प्रसिद्ध नाही याची आम्हाला जाणिव आहे.[ त्यामुळे गपचूप आपले चड्डीत राहिलेले बरे ...]

असो. खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला."

आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ...

तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो....

आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..."
आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...]
आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही ....

6 comments:

Unknown said...

'apan ka lihito' yach he saraL sadh uttar awdla.. manasik samadhan..! atishay soppya bhashet lihila mhanun..nahitar bakichi yach vishaya varchi high fundoo posts agadi dokyavarun geli hoti..

छोटा डॉन said...

Aabhaar ...
Aapalyaala jevadh kalate,je kharach manapaasun vatate, tevadhach aapan lihato...

Anamika Joshi said...

kharach chhan, ani manapasun ani talamalini lihila ahe.

sadha sopa ani manapasun lihilela asalyane ajunach manala jast bhidala.

asach talamalini blog var lihun jar samajacha prabodhan zala ani samaj pragat houn tumhi lihilele sarv problems sutale tar lihinyacha sarthak zala asa vatel.

कोहम said...

mitra...lihit raha....aamhi vacaht rahu.......

Jaswandi said...

mast lihilays!

Meghana Bhuskute said...

are wa! aamcha kho ithawar pochala? mast ahe! sahi lihil ahes. kuni kho denyachi wat na pahata swatahun lihilyabaddal dhanyawad. :)