Tuesday, November 10, 2009

.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!

२ दिवसापुर्वी महाराष्ट्र विधानसभेत जे घडले ते निश्चितच आपल्या गौरवशाली (आता हा शब्द निर्रथकपणे किती दिवस वापरायचा हा प्रश्नच आहे, कसला गौरव ते हर्षवर्धन पाटील जाणोत) परंपरेला साजेसे जरी नसले तरी ते आवश्यक जरुर होते. बाकी आम्हाला तांत्रिक बाबीत घुसायचे नाही पण जे काही घडले ते पाहुन बरे वाटले इतकेच म्हणतो.

अबु आझमी हा इसम मुळातच मस्तवाल आहे. हा माणुस महाराष्ट्रात निवडुन कसा येतो हेच आश्चर्य आहे त्याबद्दल त्या मतदारसंघातल्या (उरल्या-सुरल्या) मराठी किंवा अमराठी पण महाराष्ट्रिय माणसाने आत्मपरिक्षण करायला हवे. मतदारसंघातला निवडक युपी/बिहार वाले मतदार आणि जमलेच तर धर्माच्या नावावर अजुन काही मतदार गोळा करुन त्यांना चुचकारायचे, पाण्यासारखा पैसा ओतायचा, सोबत पोसलेले गुंड आहेतच "इतर" कामे उरकायला, मग काय झाले निवडुन न यायला ?
असो, तो वेगळा मुद्दा आहे ...

मनसेची मागणी अतिशय साधी होती, त्याचा इतर जणांना उगाच प्रेस्टिज इश्श्यु करायची गरज नव्हती, शिवाय हे करत असताना आपण प्रत्यक्ष राज्याच्या भाषिक अस्मितेला आव्हान देतो आहे हे त्यांच्या लक्षात येईल अशी सुज्ञ अपेक्षा ठेवण्याइतके आपण मुर्ख नाही आहोत. त्यामुळे जे काही घडले त्याचे आधीच पुर्ण कॅक्ल्युलेशन करुन आझमींनी अडेलतट्टुपणाकरुन वाद ओढावुन घेतला व त्यात तापलेल्या तव्यावर इतर पक्षांनी "मनसे विरोधी द्वेषाची" पोळी भाजुन घेतली असे आमचे मत झाले आहे ...

झालेल्या घटनेस सर्वस्वीपणे स्वतः अबु आझमी आणि सरकारमधले उच्चपदस्थ की ज्यांना काय आणि कसे घडेल व त्यांचे देशभर पडसाद काय उमटतील ह्याची पुर्णपणे कल्पना होती पण त्यांनी जाणुनबुजुन निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळुन परिस्थिती एवढी चिघळु दिली.
मनसेच्या लढाऊ आमदारांचे अभिनंदन व इतर बोटचेप्या आमदारांचा धिक्कार ...!!!

काही महत्वाचे मुद्दे की जे पाहुन हे कारस्थान मुद्दामुन मनसेला आडवे जाण्यासाठी रचले गेले अशी आम्हाला शंका येते.

१. जरी कायद्याप्रमाणे कोणताही आमदार अगर खासदार राज्यघटनेत सुचवल्या गेलेल्या मातॄभाषेव्यतिरिक्त इतर १८ भाषात शप्पथ घेऊ शकत असला तरी ह्याचे प्रयोग वारंवार महाराष्ट्रातच कशासाठी ?
इतर राज्यातले समकक्ष उदाहरण डोळ्यासमोर आहे काय ? का मराठी अस्मितेला नेहमीच आव्हान देऊन मराठी माणसाला किंवा मनसेसारख्या मराठी मुद्दा घेऊन लढणार्‍या पक्षाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असे उचकावले जाते ?

२. अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहेत, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे व त्यांची मातॄभाषा हिंदी असल्याने व त्यामुळेच मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रिय जनतेच्या सन्मानासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ?
शिव्यागाळी करायला बरी मराठी जमते ?

३. राज ठाकरे ह्यांनी पुर्वसुचना देऊनसुद्धा प्रकरण एवढ्या थराला गेले ह्यावरुन सरकारने मुद्दामुन हयकडे डोळेझाक केली व नंतर तत्परतेचा आव आणुन कारवाई केली असे आम्हाला वाटते.
आजपर्यंत संसदेत कितीवेळातरी "मार्शल्स" बोलावले आहेत मग ही काळजी काल का घेता आली नाही ?

४. ज्यांनी अजुन शपथच घेतली नाही अशा २ आमदारांना ४ वर्षासाठी निलंबीत करणे ह्याचाच अर्थ सरकार आधीच घुडघ्याला बाशिंग बांधुन बसले होते असा घ्यायचा का ?

५. अबु आझमींना सभापतींच्या आसनासमोर उभे राहुन जी "चप्पल दाखवली" व त्यानंतर अ‍ॅच्युअल धक्काबुक्कीला सुरवात झाली हा महत्वाचा मुद्दा सरकारच्या दृष्टीने काहीच किमतीचा नाही का ?
चप्पल दाखवल्यावरही अबु आझमी निर्दोष ठरुन सभागॄहात बसुच कसे शकतात ?

६. शपथ घेऊन खाली उतरल्यावर मात्र फलक फडकावणार्‍या "शिशीर शिंदे" ह्यांना ढकलुन त्यांच्याशी धक्काबुक्कीची सुरवात कोणी केली हे सरकारने तपासुन पाहिले आहे काय ?
मिडिया फुटेजमध्ये तर स्पष्टपणे आधी आझमींनी ढकलल्याच दिसते आहे ....

७. "वसंत गिते" ह्यांनी नेमके काय केले हे कळु शकेल काय ? कारण आम्ही जे काही फुटेज पाहिले त्यात गिते हे बरेच मागे अथवा प्रत्यक्ष सहभागी नसल्याचे आढळले.
केवळ नाशकात सरकारातल्या एका वरिष्ठ मंत्र्याला स्पर्धा नको म्हणुन गितेंना बाहेर काढण्यात आले काय ?

८. वाद होणार हे माहित असुनसुद्धा सरकारतल्या कोणी वरिष्ठांनी अबु आझमींना विनंती करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असे काही घडले आहे का ? नसल्यास का नाही ह्याचे उत्तर मिळावे ?
सभागॄहात शांतता रहावी हे सगळ्यांचेच कर्तव्य नाही का ?

९. आता महत्वाचा मुद्दा की वर्षाची शिक्षा कितपत योग्य आहे ?
आमदार एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का ?
६० च्या दशकात "जांबुवंतराव धोटे" ह्या विदर्भातल्या आमदाराने थेट सभापतींना पेपरवेट फेकुन मारला त्या प्रकरणात किती शिक्षा झाली होती ?
दस्तुरखुद्द "छगन भुजबळ" हे जेव्हा शिवसेनेचे एकमेव आमदार होते तेव्हा ते एवढा धिंगाणा घालत की त्यांना कित्येकवेळा मार्शलकरवी अक्षरशः "उचलुन" सभागॄहाबाहेत न्हेले असल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा किती शिक्षा व्हायची भौ त्यांना ?
शिवसेनेच्या गुलाबराव गावंड्यांनी भर विधानसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन घेऊन स्वतः रोबरच इतर सदस्यांनाही धोका उत्पन्न केला होता, त्याचे संदर्भ घेतले आहेत काय ?
कित्येकवेळा माईक उखडले, कागदपत्रे फेकली, धाराधरी व पळापळी झाली, धक्काबुक्की सदृष्य घटना ह्याच सभागॄहात घडल्या आहेत, मग ह्यावेळीच इतकी कठोर शिक्षा का ?


जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.

आता ह्यातुन आपले ( पक्षी : सर्वसामान्य मतदाराचे ) नुकसान असे झाले की जे मनसे चे आमदार विधानसभेच्या कार्यकाळात प्रश्न विचारुन अथवा पाठपुरावा करुन सरकारला अडचणीत आणु शकले असते ते आता बाहेत गेले आहेत. त्या ४ जणांचा "आमदार निधी" ही माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात होणार्‍या भविष्यातील विकासकामांना ह्याची निश्चितच कमतरता भासेल ...
एवढी कठोर शिक्षा द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती ...

फायनली जर ही घटना समराईझ करायची म्हणले तर मी असे म्हणेन :
अबु आझमीने आपण युपी / बिहार वाल्यांचे आणि महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या हिंदीभाषिक लोकांचे सध्याचे "एकमेव तारणहार" आहोत ही प्रतिमा मजबुत करण्यात यश मिळवले. अबु आझमीचे आज देशपातळीवर नाव झाले हे सत्य आहे. any publicity is good publicity ... !!! अबु आझमीसाठी सरळसरळ विन-विन सिच्युएशन आहे ...
मनसेबाबत म्हणाल तर आपणच आता एकमेव मराठी अस्मितेचे तारक आहोत हा दावा त्यांनी चांगलाच मजबुत केला, भले त्यांना ह्या प्रकरणात ४ लढाऊ आमदारांच्या निलंबनाचे नुकसान सोसावे लागले. बरेच लोक म्हणत आहेत की हे बाहेर गेले ४ जण पुढच्या वेळी अजुन ४० जणांच्या खांद्यावर बसुन थाटामाटात विधानसभेत प्रवेश करतील, होप सो तसेच घडेल. तसे बघायला मनसेसाठीही ही "विन-विन" वाटल असली तरी मला सध्याच्या कालमर्यादेच्या कक्षात ही "विन-लुज सिच्युएशन" वाटते ....

तुर्तास मनसे आमदारांचे अभिनंदन ... !!!

जय महाराष्ट्र !!!!

4 comments:

Ajay Sonawane said...

he mudde maajhy kadhich dokyat ale navate, ekdam vichar karayala lavnare mudde ahet, khaach vasant gite yani tar kahich kele navte tari tyanchyvar ka karavaai , khup chan lihila aahe.

-ajay

जय घोलप said...

Ekdum Jabardast Vishleshan....

MANASE che Abhinandan!!!!

Unknown said...

Dude.. Amazing analysis.. One suggestion. Try to spread this analysis to more and more ppl via email,orkut facebook etc etc.. "Aaata Uthavu Saare Raan" ase karayachi paali analeli aahe hya haraamkhoraani

onkardeshpande said...

raje jay maharashtra!!!!!!!!!!!

Tumachya blog che ALEXA ranking 7 aahe - 13/11/2009 roji he farach uttam. tumhi orkut var blog chi link takata he far uttam - blog chya promotion chya drushtine. Baki tumache likhan uttam.