Tuesday, November 17, 2009

स्ट्रेट ड्राईव्ह, हाराकिरी आणि ऒफ़साईड वगैरे वगैरे...

म्हणजे बघा सिच्युएशन प्रचंड कॉप्लेक्स आहे. भल्याभल्या समिक्षकांचा आणि ह्या क्षेत्रातल्या दादा माणसांचा ह्यात कस लागु शकतो.

" एक वेल सेट फलंदाज (उदा : सचिन तेंडुलकर ) कसलेल्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत एखाद्या भिंतींसारखा खेळपट्टीवर उभा आहे. विरुद्ध बाजुच्या कर्णधाराचे आणि गोलंदाजचे सर्व डावपेच त्याच्या सरळ बॆटीमधुन आलेल्या ड्राईव्हच्या फ़टक्याबरोबर सीमीरेषेपार वाहुन जात आहेत. बघता बघाता त्याचे द्विशतक जवळ आले आहे, १९९ धावा बोर्डावर लागल्या आहेत. पटकन १ धाव काढुन द्विशतक पुर्ण करण्याची तडप त्याच्या चेहर्‍यावर सहाजिकच स्पष्टपणे दिसत आहे व ह्याच घोळात तो एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अर्थातच ही धाव मुळीच चोरटी वगैरे नसते, तो असते विरुद्ध संघाच्या धुर्त कर्णधाराचा ( उदाहरणार्थ : हिंदी-इंग्लिश मिडीया ) एक कसलेला डाव. बॅटवर आलेला एक सरळ, साधा चेंडु कव्हरकडे हलकेच ढकलुन तो धव घेण्यासाठी पळायला प्रारंभ करतो. ठरल्याप्रमाणे गोलंदाज चेंडुला कव्हर देण्याच्या बहाण्याने फलंदाजाला आडवा जातो व त्याचा धक्का लागुन फलंदाज पडतो. तोवर तिकडे दक्ष असलेल्या क्षेत्ररक्षकाचा थ्रो बरोबर स्टंपकडे जाऊन यष्ट्या उद्धवस्त होतात. गोलंदाज व क्षेत्ररक्षक जोरदार अपिल करतात व नियमाप्रमाणे जरी फलंदाज बाद असला तरी नैतिकदॄष्ट्या हे चुकीचे आहे हे माहित असुनसुद्धा आपले कर्तव्य म्हणुन पंच ( इथे उदाहरणार्थ : बाळासाहेब ठाकरे ) त्याला बाद देतात. फलंदाज निराश होऊन तंबुत परततो व टीव्हीसमोर बसलेले स्वयंघोषीत समिक्षक ( उदाहरणार्थ : विविध पक्षांचे प्रवक्ते की ज्यांना कधीमधी अशा घटनांवर प्रतिक्रिया देऊन लाईमलाईटमध्ये रहावे लागते. असो, तो मुद्दा वेगळा ), सामान्य प्रेक्षक, क्रिडाप्रेमी विरुद्ध संघाचा डावपेच समजुन न घेता पंचाच्या नावाने मनोसोक्त खडे फोडुन रिकामे होतात ....."

सध्या असेच काही घडले आहे ना ?

आपल्या (अरे हो, आख्ख्या देशाच्या म्हणावे लागेन ना. आजकाल उगाच कशाला रिस्क घ्या बाबा) सचिनच्या कारकिर्दीला २० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने घडत असलेल्या समारंभात व मुलाखतीत एका (हलकट म्हणावे का?) पत्रकाराने मुद्दामुन खाजवुन खरुज काढण्याच्या उद्देशाने "मुंबई"विषयी प्रश्न विचारला. अर्थातच सचिन (आमच्या पवारकाकांसारखा) कसलेला राजकारणी नसल्याने त्याने निरागसपणे आणि प्रामाणिकपणे "I am extremely proud of being a Maharashtrian, but Mumbai is a part of India and I play for India" असे उत्तर दिले. तसे पाहिले तर टेक्निकली ह्या उत्तरात अजिबात काही चुक नाही, त्याचा अर्थही अगदी सरळ आहे.
पण आता कहानी मे ट्विस्ट इथे आहे, लगेच ह्या वाक्याला प्रमाण मानुन व त्याला हवे तसे वाकवुन देशभरातल्या मिडीयाने "सचिन म्हणतो, मुंबई सगळ्यांचीच. प्रदेशवादाला सचिनचे स्ट्रेटड्राईव्हद्वारे खणखणीत उत्तर" वगैरे कंड्या पिकवायला सुरवात केली. वास्तविक पहाता ज्याची काही आवश्यकता नव्हती त्या वादाला सुरवात इथे मिडियाकडुनच घडाली. मुळात ते वाक्य त्या उद्देशाने उच्चारले गेले नसतानाही त्याचा हवा तसा अणि स्वतःच्या सोईचा अर्थ काढुन उगाच रान पेटवणे हे मिडियाच्या कोणत्या तत्वात बसते ?
जवळपास ३ प्रहरे मिडियाने हा हैदोस घातल्यानंतर (राज ठाकरेच्या मराठी टक्क्याच्या जबरदस्त तडाख्याने आधीच घायाळ असलेली) शिवसेना आता ह्या वादात उतरली. दुसर्‍या दिवशी सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन " सचिन, तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ! " ह्या शिर्षकाखाली सचिनला ( सो कॉल्ड ) ४ खडे बोल सुनावणारे शिवसेनाप्रमुखांचे (?) पत्र प्रसिद्ध झाले.
अपेक्षेप्रमाणे देशभरचा मिडिया अधिक पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवणारे समिक्षक, प्रवक्ते वगैरे टिनपाट लोक लगेच ठाकर्‍यांवर आणि शिवसेनेवर तोंडसुख घेऊ लागले. इथे ठाकर्‍यांनी तर फक्त त्यांचे कर्तव्य केले होते हे मात्र सर्व सोईस्करपणे विसरले.

----------------------------------------------------------------

आता काही आमचे मुद्दे किंवा अस्ताव्यस्त विचार :

१. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंड सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता.
सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतेवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही?
होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ?
देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ?
(ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.)

२. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ?
एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते.
मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.

३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला.

४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम.

ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे. ह्या समजुतदारपणासाठी मनसेचे अभिनंदन ...!!!

आता २ शब्द सचिनसाठी :
सचिन तु आमचा देव होतास आणि आहेस आणि चिरंतन राहशीलही. पण तुझे देवत्व आम्ही फक्त क्रिकेटच्या खेळपट्टीपुरतेच मानतो ह्यात मात्र गल्लत होऊ देऊ नकोस, समोरच्याचे डावपेच ओळखुन बॉल तटवायला लागला तरी हरकत नाही.
तु जर ह्या जागी फुटबॉल खेळत असता तर आम्ही त्वरित "ऑफसाईड" चा फ्लॅग दाखवला असता, कमीत कमी ह्या खेळात ह्या क्षणाला खेळ थांबुन पुर्वीची चाल बाद ठरुन पुन्हा पहिल्यापासुन चाली रचाव्या लागतात.
मात्र क्रिकेटचे आणि समाजकारणाचे ( किंवा राजकारणाचे ) असे नाही , इथे फलंदाजाने एकदा टोलावलेला चेंडु किंवा तुझ्यासारख्य एखाद्या आयकॉनने मुखातुन उच्चारलेले वाक्य ह्याला परतीचे वाट नसते....त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो, चेंडु सीमापार जाऊन विजयध्वज फडकावु शकतो किंवा झेल जाऊन आख्खा सामनाच गमावण्याची पाळी येऊ शकते.

- तुझा एक चाहता
छोटा डॉन

15 comments:

seema tillu said...

chhan lihile aahe. ha sagla gondhal vakyacha chukicha artha kadhlyamule zala aahe.sachinchya sadhya uttaracha ulta artha kadhun sarva deshbhar gondhal ghatla jatoy.

Unknown said...

भले शाब्बास डॉण्या . ... लेख एकदम खंगरी जमलाय !! तुफान टोलेबाजी ... लेका त्या सामना च्या वर्तमान संपादकाला आता नारळ देऊन तुला अपाँईंट करायला हवाय !! अगदी मुद्देसुद , भानावर राहून , ताळतंत्र असलेली फलंदाजी केलीये !!

- टारझन

Pratul said...

Agadi sankuchit vicharsarani zaliye Maharashtrachi. Ya baddal khed vatato.

छोटा डॉन said...

@ प्रतुल :
महाराष्ट्राची विचारसारणी संकुचित झाली हे कसे काय ठरले ?
बाकीच्यांनी हवा तसा नंगा नाच घालावा व महाराष्ट्रानेच सर्व काही संभाळुन घ्यावे ह्याचा मक्ता घेतला आहे काय ?

मागच्या एका पोस्टमध्ये आम्ही म्हणलेच आहे ...

'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?

असो.

बाकी सीमा आणि टारझनशेठ, आभारी आहे.

- छोटा डॉन

onkardeshpande said...

va raje uttung shatkar lagavala aapan.

Dk said...

oye Don r u d agent of....?? ;)
hahaha sahiye bhidu!!!

विनायक said...

abhinadna
Chota don
Please forward my wishe to raje also
Vinayak Pachalag

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

स्टार माझ्या च्या ब्लॉग स्पर्धेत आपल्या ब्लॉगला उल्लेखनिय विजेतेपद प्राप्त झाले. आपले अभिनंदन!

Deepak said...

स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!

Swapnil Demapure said...

Don Bhai Star majha Blog compitition madhe select jhalya baddal Hardik abhinandan......
Full Don-giri kay........

http://ransangram.blogspot.com

ransangram said...

Hardik Subhecha......

Pratul said...

Tu Germany la ka gela hotas mag maharashtra sodun? Aani aatta tari Bangalore madhe rahun Kannad bolta yete ka tula?

Rajesh Mhatre said...

well said!!

nikhil said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.