Wednesday, August 27, 2008

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!


.
समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे. दिवसेंदिवस रटाळ, टाकाऊ, बोगस, बेचव अन्नपदार्थ तुमच्या नशिबी येत आहेत, त्यामुळे जिभेला व मनाला एक प्रकारची बाभळी आली आहे.

त्यात आशेचा किरण म्हणजे गेले काही दिवस एका "प्रसिद्ध हॉटेल" कडुन "लज्जतदार, चवदार व जिभेचे पांग " फेडु शकणार्‍या एका भुतोनभविष्यती अशा "फुडफेस्टीवलची जाहिरात" पेपरातुन प्रसिद्ध होत असते. तुम्ही दररोज त्याची चवदार वर्णने पेपरातुन वाचत असता, त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे खास झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसालेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ येथे तुमचे चोचले पुरवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। तुमच्या नजरेत एक वेगळीच चमक येते, मनाला एक उत्साह वाटु लागतो, शरिराला एक तरतरी येते व तुम्ही त्या "खाद्यमहोत्सवात " आपले सीट बुक करण्यासाठी धाव घेता, तुमच्या समव्यसनी मित्रांना पण तुम्ही पटवता व तुमच्या भाग्याने तुम्हाला बुकिंग मिळते सुद्धा. तुम्ही छाती वीतभर जास्तच फुगवुन त्या "बुकिंगची" आपल्या मित्रपरीवारात व इतर ओळखीच्या लोकात जाहीरात करता। काही लोक तुमच्याकडे "तुमची काय बाबा ऐश आहे, आमचे एवढे भाग्य कुठले " असे आसुयेचे उद्गार काढुन त्यांच्या दुर्भाग्याची हळहळ व्यक्त करतात तर काही जाणकार लोक "त्यात काय दम नसतो बाबा, आपली घरची मीठभाकरी बरी" असा निराशेचा सुर काढतात। पण तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो व तुम्ही त्या मानसीक स्थीतीतही नसता. आता तुमच्या रक्तात त्या "खाद्यमहोत्सवाचे खुन सवार झाले असते" व डोक्यात त्याची नशा चढलेली असते.

मग तो सुदीन उजाडतो, तुम्ही अतिशय उत्साहाने त्या "कार्यक्रमस्थळी" जाता. वातावरण एकदम भारलेले आहे. आधी जाहीरात केल्याप्रमाणे सर्व पदार्थांची रेलचेल आहे. अनेक प्रतिष्ठीत व मोठ्ठी मंडळी जेवणासाठी रांगा लाऊन शिस्तीत उभी आहेत. तुमचाही नंबर येतो, तुम्ही तुमच्या जागेवर बसता व तोंडाला पाणी सुतलेल्या अवस्थेत आपल्या समोर डिश येण्याची वाट पाहता. शेवटी तो "सोनीयाचा क्षण" येतो, राजेशाही पोशाख केलेले वाढपी तुमच्यासमोर झाकलेली "सो कॉल्ड लज्जतदार डिश " आणुन ठेवतो। तुम्ही आधाशीपणाने त्याचे झाकण काढुन फेकता व वखवखलेल्या नजरेने त्या डिशकडे पाहता ....

पण हाय रे कर्मा ऽऽऽऽऽ

त्या गाढवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अन्नपदार्थ एकाच ताटात वाढण्याचा मुर्खपणा केल्याने त्याच्या चवीचा पार बँड वाजला असतो. सरमिसळ झाल्याने त्याची वेगळी चव अशी लागत नाहीच. जाहीरात केल्याप्रमाणे झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसलेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ खरेच तेथे असतात पण त्यांची सरमिसळ झाल्याने तुमचा अपेक्षाभंग होतो. तुम्ही पट्टीचे खाणारे असल्याने असल्या "भेसळीची" तुम्हाला सवय नसते त्यामुळे " श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, खमणठोकणा, मटनाचा तांबडा रस्सा, हक्का न्युडल्स, वांग्याचे भरीत" असे उत्तमोत्तम पदार्थ एकाच बैठकीत एकाच ताटात व एकाच वेळी खाण्यास तुमचा तात्वीक विरोध असतो। खल्लास ऽऽऽऽऽ . तुमच्या मुडचा पार बोर्‍या वाजला असतो, आता भरल्या ताटावरुन उठण्यास तुमची तयारी नसते कारण "मोजलेले बक्कळ पैसे व जनलज्जा", त्यामुळे तुम्ही कशीबशी डिश संपवता व आयोजकांना शिव्या देत बाहेर पडता. त्याच तीरमिरीत आयुष्यात पुन्हा कधी असल्या कार्यक्रमाला जाण्याची [ व न पाळली जाणारी ] शप्पथ तुम्ही घेता. त्यानंतर ह्या अनुभवानंतर मित्रात झालेले तुमचे हसे वेगळेच ...एकंदरीत खिशाला चाट बसवणारा व मनोसोक्त मनस्ताप देणारा हा अनुभव ठरतो ...

नक्की चुक कोठे झाली ?
तुमच्या साईडने तर तुम्ही अगदी अचुक आहात, मग नक्की बिघडले काय ?
ह्याचे उत्तर आहे "कुटलीही पुर्वचौकशी न करता अन्नपदार्थावर भुलुन आयोजकांवर ठेवलेला अंधविश्वास" ....
ह्याला काही उत्तर नसते तुमच्याकडे कारण हा तर तुमचा "वीक पॉईंट" !!!

नेमके हेच "सिंग इज किंग" नामक सध्या "सो कॉल्ड गाजत असलेल्या व यशाचे अनेक विक्रम उद्धवस्त " करणार्‍या चित्रपटाबाबत घडते। त्यातल्या कलाकारांच्या पुर्वपुण्याईला भुलुन व प्रचंड जाहीरात होत असलेल्याने व त्यात दाखवलेल्या दॄष्यांना भुलुन तुम्ही पदरमोड करुन पिक्चरला जाता हीच ती "घोडचुक" ...

आता थोडेसे स्टोरी बद्दल, मुळात सगळ्यात मोठ्ठी बोंबाबोम्ब इथेच असल्याने मी काय लिहणार हा प्रश्न आहे।तरीपण जनरीती प्रमाणे काही तरी लिहावेच लागेल ...

तर त्याचे असे आहे की चित्रपटाचा नायक "हॅप्पी सिंग [ अक्षयकुमार ] " पंजाबातल्या एका कुठल्याश्या खेड्यात रहात असतो. तो लहानपणापासुनच थोडासा अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश, लाडोबा व तरीही इतरांच्या मदतीला धावून जाणारा, गावकऱ्यांच्या खोड्या करणारा काहीसा साधाभोळा, थोडास बनेल, मोकळा ढाकळा शीख तरुण आहे. आता एवढ्या भुमीका तो एकाच वेळी कशा सांभाळतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो पण दिग्ददर्शक असल्या मुलभुत भावनेतुन दुर जाऊन अतिशय उच्च पदाला पोहचल्याने त्यांना हा प्रश्न पडला नसावा. त्याचा एक मित्र "रंगीला [ ओम पुरी ] ", हा हॅप्पी पेक्षा किंचीत कमी पण तसाच अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश. ह्या दोघांनी आपला " महान कॄत्यांनी" गावकर्‍यांना पुरते हैराण केले असते व ते बिचारे हतबल झाले असतात। पण मुळात हे दोघे "लाडोबा" असल्याने त्यांना कुणी समजावुन सांगण्याचा वा समज देण्याचे दुष्कॄत्य करत नाही व ह्यांचे चाळे चालु राहतात. ह्यांच्या हाताला काम व डोक्याला ताण नसल्याने ह्यांना अनेक अफाट कल्पना सुचत असतात, त्यातल्या एका प्रसंगात हॅप्पी सिंग एक कोंबडी पकडण्यासाठी निम्मे गाव खाली झोपवतो व त्यांच्या नुकसानीची पर्वा न करता " कोंबडी पकडली की नाही" असा आव आणुन ताठ मानेने फिरक असतो. गावकरी ह्यांना काहीतरी कारण काढुन गावाबाहेर हकलुन देण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यच्यामध्ये ह्यांचे चाळे चालुच असतात व इकडे आपली कवटी सरकत असते. कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.असो.

त्याच्यादरम्यानच त्यांच्यांच गावचा एक सुपुत्र "लकी सिंग [ सोनु सुद - चांगला कलाकार आहे बिचारा ] " हा ऑस्ट्रेलियात जाऊन डॉन बनला असतो व त्याचे तिकडे ११ भाई गँग्स व ११ देशातल्या पोलीसांशी चांगलेच वाजले असते। त्यातुनच त्याच्यावर एक "खुनी हल्ला" होतो, तो जखमी होतो, ती खबर एकडे पंजाबातल्या गावात येते, त्याचे वडील आजारी पडतात व लकीला परत आणा असा हट्ट धरतात. गावकर्‍यांनी ही चांगली संधी वाटते, ते "हॅपी व रंगीला" यांना ह्या कामगिरीवर पाठवतात व आयुष्यात कधीही गावाची वेस न ओलांडलेले दोघे डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला निघतात...

इथपर्यंत आपण पिक्चर कसाबसा सहन करु शकतो ...
त्यानंतर जो मुर्खपणाचा कळस सुरु होतो त्याला तोड नाही आणि उत्तर तर नाहीच नाही ...

त्या प्रवासाच्या दरम्यान ह्या २ अर्धवट गाढवांचे तिकीट दुसर्‍याशी अदल्याबदल झाल्याने ते इजिप्तला जातात व तिकडे "पटकथेच्या मागणीनुसार" त्यांना "सोनिया [ कतरिना कैफ ] " भेटते. आता हे इजिप्तला कसे जातात? त्यांना सोडते कोण ? तिकडे त्यांची व्यवस्था काय ? व्हिसाचे काय ?असले मला पडनारे क्षुल्लक त्यांना पडत नाहीत व ते त्याची काळजीही करत नाहीत। असो. त्यानंतर त्यांना मधीच आठवते की आपल्याला तर ऑस्ट्रेलियाला जायचे होते, मग पुन्हा गाडी ऑस्ट्रेलियात पोहचते व ह्यापुढचा समस्त गाढवपणा, हैदोस, पाचकळपणा हा ऑस्ट्रेलिया ह्या देशी घडतो [ व आपल्याला मस्त "देशी" पिऊन शांत झोपावे अशी इच्छा होते ]....
तर होते काय की ह्या गडबडीत त्या खर्‍या "किंग उर्फ लक्की" वर पुन्हा एक हल्ला होऊन तो जायबंदी होतो व त्यांच्यासमोर आता आपला नेता कोण हा प्रश्न पडतो. दुसरे कोणी "लायक" न सापडल्याने पुन्हा एकदा "पटकथेच्या मागणीनुसार" हे लोक "हॅप्पी सिंग उर्फ अक्षयकुमारला" नवा किंग म्हनुन घोषीत करतात. मला नाही झेपला हा प्रकार. ४ शब्द सरळ बोलता येत नसलेला, अक्षरश : अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश हा "हॅप्पी सिंग" कुठल्या कर्तुत्वाने "किंग" होण्यास लायक होतो. फक्त डोक्यावर पगडी हा नॉर्म असेल तर "हरभजसिंगने" काय घोडे मारलेय ? [ तसा तो पण थोडा अर्धवट आहे म्हणा पण तो आपला विषय नाही.]

आता आम्ही सावरुन बसतो, डोक्याने अधु ब बुद्धीने अर्धवट असलेला "हॅप्पी" त्याच्या अंगच्या गुणामुळे काही तरी धमाल उडवुन देणार व ज्यासाठी आपण एवढे रुपडे मोजले तो "अफाट विनोदी शिन्स" पहायला भेटणार ...
पण नाही। सगळे मुसळ शेवटी केरातच !

पण मुळात गुंडगिरीला विरोध असणारा हॅप्पी हा किंग झाल्याझाल्या एकदम "बापु, भय्या, अम्मा, महाराज" टाईप वागायला लागतो व कुत्र्याचे वाकडे शेपुट सरळ [ म्हणजे त्या गुंडांना सुधरवायच्या ] करायच्या मागे लागतो। त्याला संधीही तशी मिळते. आरंभीच्या त्याच्या ऑस्ट्रेलियात हलाखीच्या काळात म्हणजे जेव्हा " लक्की खाऊ घालीना व पगडी भीक मागु देईना" अशी परिस्थीती असते तेव्हा त्याला मदत करणार्‍या [ फुलाचे दुकान चालवणार्‍या ] एका बाईच्या पोरीच्या सुखासाठी एक नवे नाटक तो उभारायचे ठरवतो. त्याच्या सुदैवाने [ व आपल्या दुर्दैवाने] ती कन्या म्हणजे खुद्द "सोनिया" निघते। आता बोला ! काय बोलणार, ती तर पटकथेची मागणी, आपण हाताची घडी आणि कपाळावर बोट. त्यात भर म्हणुन ती बरोबर आपला बॉयफ्रेंड "पुनीत [ रणवीर शौरी , तोच तो थप्पडखाऊ अभिनेता. आठवा "अग्ली & पग्ली ". जाऊ दे, कशाला आठवताय, फुकट डोक्याला शॉट ] यालाही बरोबर आणते. मग त्या [ पुर्वाश्रमीच्या श्रीमंत ] बाई ची इज्जत जाऊ नये म्हणुन हा नवा किंग अख्ख्या गँगला एका पोरकट खेळात ओढतो व अख्ख्या पिक्चरचा खेळखंडोबा करतो.

इथुन पुढे मी माझे [ पगडी नसलेले ] डोके चालवण्याचा व वापरण्याचा निष्फळ प्रयत्न सोडला व "दाखविले किंगे तैसेची पहावे, चित्ती असु द्यावे असमाधान" ह्या उक्तीनुसार पुढचा चित्रपट पाहिला ...

नंतर जो प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठीचा त्याग असा भंपक ड्रामा, जिकडे तिकडे फक्त सिंगच , किंग म्हणून कोणीच नाही, सोनिया आणि पुनितचं प्रेमप्रकरण व त्यात हॅप्पीच्या हितचिंतकांची लुडबुड व त्याला हॅप्पीने फटकारणे, काही अगम्य आणि अतर्क्य घटनातुन किंगच्या इरसाल आणि अस्सल गुंड साथ्यांचे मानसीक परिवर्तन, सोनियाला सच्च्या प्रेमाचा साक्षात्कार व तिच्या लग्नाच्या वेळी गोंधळात तिचे गडबडीने तिचा हॅप्पीशी होणार विवाह व तिनेही खेळकरपणे याला दिलेली मान्यता हे विनोद, प्रसंग मला नाही झेपले। मात्र ह्या घोळात पिक्चर "झोपला" हे नक्की ...शेवटी तर असा गोंधळ उडतो की "किंग" कुठेच दिसत नाही , सगळीकडे फक्त आणि फक्त पगडीवाले "सिंग" च दिसतात.त्यामुळे आपली डोक्याची पगडी सटकुन सिनेमागॄहात कुठेतरी हरवते ...

शेवटी एकदाचा [ कसाबसा ] सिनेमा संपल्यावर आपण आपली अकलेची पगडी जी तिकीट काढताना मोठ्ठ्या सन्मानाने घातली होती ती आता कुठे हरवली याचा विचार करत चित्रपटगॄहाच्या बाहेर पडतो।

माझा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला, निर्मात्यांना व कलाकारांना एकच छोटा प्रश्न आहे की " एवढा टाकाऊ, टुकार, भंगार पत्रा लोखंड, पाचकळ, पुचाट सिनेमा तुम्ही कशाच्या जोरावर हिट म्हणता ? पगडी न घालणार्‍या बिनडोक मिडीयाला हाताशी धरुन अवाढव्य उत्पन्नाचे आकडे तोंडावर फेकले की सिनेमा चांगला कसा ठरु शकतो ? पब्लिकचे [ विना पगडेआवाले ] डोके काय पेंड खायला जाते का एवढे उत्पन्न मिळवुन द्यायला ?"

तात्पर्य : हा "सिंग" नावाचा "किंग" आपल्याला चांगलाच "हिंग" लाऊन जातो ...

---[ विना पगडीवाला किंग ] छोटा डॉन

Tuesday, August 5, 2008

प्रसिद्धी : जालकवींच्या कविता: एक आवाहन

ह्या कार्यक्रमाची मुळ संकल्पना " श्री. मिलिंद भांडारकर व श्री. चक्रपाणी चिटणीस" ह्यांची आहे.त्याला पाठिंबा व शक्य ती मदत म्हणुन आम्ही त्यांचे "निवेदन" जसे आहे तसे आमच्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत ह्याची नोंद घ्यावी ....

धन्यवाद !

*******************************************************************

प्रसिद्धी : जालकवींच्या कविता: एक आवाहन

आरंभ: १४/०२/२००९ - ०९:००
समाप्ती: १६/०२/२००९ - २२:००
ठिकाण: सॅन होजे, कॅलिफोर्निया
माहितीचा स्रोत: मिलिंद भांडारकर व चक्रपाणी चिटणीस
.
सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या आंतरजालाच्या उगमस्थानी होणाऱ्या पहिल्यावहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात "काहीतरी वेगळे" स्वरूपाचा एखादा मराठमोळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आंतरजालीय साहित्याशी रसिकांची ओळख करून देणे या हेतूने मिलिंद भांडारकरांना सुचलेल्या एका कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने हे आवाहन करीत आहे. याबाबतीत संमेलनाच्या संयोजकांशी प्राथमिक बोलणे झाले असून तुमच्याआमच्यासारख्या हौशागवशा जालकवी,जालसाहित्यिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर कार्यक्रमाचे यश अवलंबून असणार आहे.


कार्यक्रमामागील भूमिका:
आंतरजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. मुद्रित साहित्याबरोबरच आणि प्रसंगी त्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमूलाग्र परिवर्तन जरी दिसत नसले, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवीन युगातील मराठी साहित्याच्या प्रसाराला खीळ बसण्यासारखे असेल. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.


कार्यक्रमाची रूपरेषा:
एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात - अर्थात मुद्रित स्वरूपात - प्रसिद्ध झालेल्या नाहीत/नसतील. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील.कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील.काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील व्यावसायिक - "प्रोफेशनल" - नसतील.विडंबने चालतील. मात्र मूळ कविता आणि विडंबन दोन्ही जालप्रकाशितच हवे. तसेच, मूळ कवितेची निवड झाली, तरच तिच्या विडंबनाचीही निवड होईल; जेणेकरून दोन्हींचे एकत्र सादरीकरण व त्यायोगे अपेक्षित परिणाम साधता येईल.मदत हवी आहे:
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.


आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला विरोपाने (ई-मेल)पाठवावे (ई-मेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा. कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी)जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती.ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.


मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)
([dot] ऐवजी ". ", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे. )


आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद!

Thursday, June 12, 2008

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****


गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे. ह्या पुस्तकातला एक मुद्दा म्हणजे "भारत हे एक राष्ट्र आहे का ?" हा मुद्दा फ़ारच मनाला भिडला. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. त्यातच "प्रादेशिक अस्मितेतुन" सुरु झालेली आंदोलने हा याचा उगम होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

१५ ऒगस्ट १९४७ साली मध्यरात्री १२ वाजता निम्मे जग झोपले असताना पंडीत नेहरुंनी "नियतीशी एक वायदा" केला होता तो म्हणजे " भारत हे अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे एक महान राष्ट्र " बनवण्याचा. त्यासाठी त्यांच्यापासुन ते आत्तापर्यंत सत्ताधार्‍यांनी सच्च्या मनाने प्रयत्न केले असे जरी मानले तरी आजची परिस्थीती काही तरी वेगळेच सांगते आहे. मुळात एक लहान खंडा एवढा असणारा भारत हे "एक राष्ट्र" असणे ही संकल्पनाच अदभूत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व गुजरातपासून ते ईशान्यपुर्व मिझोरम, नागालॆंड पर्यंत पसरलेला, एकंदरीत २८ सरकारमान्य भाषा व अनऑफ़ीशीयली १६०० भाषा बोलणारा, हवामानात प्रचंड विवीधता असणारा व प्रचंड सास्कॄतीक व वैचारीक विविधता असलेला भारत हे गेल्या "६० वर्षे एक राष्ट्र" म्हणून टिकून आहे हेच एक आश्चर्य मानायला हरकत नाही. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा "ह्या राष्ट्राचा डोलारा" किती काळ टिकेल ह्याबद्दल अनेकांना शंका होती व ती भारतीय जनतेने खोटी करुन दाखवली हे भारतीय "एकात्मिकेचे" यश मानायला हरकत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी
जीन दिकसनने भविष्य सांगितले "भारताचे विभाजन लवकरच अनेक राज्यात होईल व भारताचे अनेक तुकडे होतील".
हेंन्री किसींजर म्हणाले " सध्या भारतात राहणाया पण मनात फ़ुटीर प्रवॄत्ती ह्या देशाचे विभाजन करतील".
त्यानंतर खरोखरच भारताला ह्या कसोटीला सामोरे जावे लागले. सर्वात आधी सरदार पटेलांनी "संस्थान विलीनीकरण" राबवून, १९४८ च्या रणात भारतीय सेनेने काश्मीर वाचवून व १९६२ च्या युद्धानंतर लालबहादुर शास्त्रींनी आपल्या प्राणाचे बलिदान करुन व इंदीरा गांधींनी काही कठोर निर्णय घेऊन व प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान करुन ह्या देशाला " वन नेशन" म्हणून टिकवण्यात अनमोल योगदान दिले व भारत हा " वन नेशन " च राहिला . ह्यामागचे कारण म्हणजे ही सर्व आक्रमणे ही "परकीय" होती व भारताने त्याचा मुकाबला ह्या " वन नेशन" ने केला. पण आज आपल्याला ह्या "परकीय शक्तींची" जास्त भीती राहिली नाही अथवा फ़ारफ़ार तर जास्त काळजी करायची गरज नाही कारण "हा देश" त्यासाठी समर्थ आहे. सध्या देशासमोर मुख्य प्रश्न आहे तो नविनच उभ्या राहिलेल्या "प्रादेशिक अस्मिता , जातीय अस्मिता " ह्यासारख्या गोष्टींनी घेतली व परिस्थीती चिघळायला सुरवात झाली आहे.

आता मुळापासून अभ्यास करायचा म्हणजे बाहेरच्या शक्तींशी लढून त्यांचा यथायोग्य बंदोबस्त केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला "सत्तेची पोळी भाजण्यासाठी" मुद्दे न राहिल्याने देशातील काही स्वार्थी राजकीय नेतॄत्वाने येथील काही "जातीय व धार्मीक असंतोषी" शक्तींना हाती धरुन एका नव्याच "वादाची " मुहुर्तमेढ रोवली व वेळोवेळी आपल्या "सत्तेची पोळी" भाजली. ह्या देशाची प्रमुख समस्या ही काही काळ "धार्मीक अस्मिता" ही होती. मग ती "हिंदु - मुस्लीम असो वा हिंदु - ख्रिश्चन वाद" ही असो पण ह्यामुळे ह्या देशाची एकात्मिका काही काळ धोक्यात आणली. मग हे हिंदुंचे "रामजन्मभुमी मुक्ती, रथयात्रा " आंदोलन असो वा मुस्लीमांचे "बाबरी मशीद , शहाबानो प्रकरण, समान नागरी कायदा, अल्पसंख्यक वर्गाला मिळणारे फ़ायदे असो वा शिखांचे स्वतंत्र खलिस्तान आंदोलन व त्यातुन झालेले ऒपरेशन "ब्यु स्टार" असो वा ख्रिश्चन मिशनयांची दुर्गम भागात चालणारी "धर्मांतर मोहीम" व त्याला विरोध म्हणून पडलेले काही मिशनयांचे खुन व त्यातुन निर्माण झालेली राजकीय महत्वकांक्षा असो ह्यातुन ह्या " वन नेशन" मधील जनता एकमेकांसमोर " शस्त्रे घेऊन" उभी ठाकली. ह्यामुळे भारतीय "एकात्मिकेला धोका" पोहचला. पण काहीश्या समंजस व हुशार नेतूत्वाने ह्या देशाचे तुकडे पडायची वेळ येऊ दिली नाही व ह्या सर्व घटनातुन तावून-सुलाखवून भारत राष्ट्र हे "वन नेशन" राहिले. ह्या प्रकारातील निरर्थकता लक्षात आल्यामुळे कदाचित सामन्य जनता ह्या प्रकारापासून दुर राहिल्याने आता काहिसे हे प्रश्न मिटले आहेत व त्यातुन "देश तुटण्याचा" धोका टळला आहे. आज शक्यतो सामान्य जनता अशा "धार्मीक समाजकंटकांना" आश्रय देईनाशी झाल्याने आपण समाधान मानायला हरकत नाही.

त्यानंतर काळ आला तो "जातीय आधारावर मांडल्या गेलेल्या असंतोषाचा", काही नेत्यांनी "जातीय आधारावर आरक्षण" ही कल्पना मांडून व ती राबवून आज पुन्हा देशाला यादवीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळातील "मंडल आयोग" व त्यांनंतर झालेले दंगे, सध्या राबवू पहात असलेल्या "ओबीसी आरक्षणाची कल्पना" व त्यासाठी चालू असलेली लढाई व त्यातुन आज उभे राहिलेले " गुज्जर समाजाच्या हिंसक आंदोलन" व त्यासाठी त्यांनी वेठीस धरलेली सामान्य जनता ह्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचा योग्य वेळी बिमोड केला नाही तर परिस्थीती चिघळायस वेळ लागणार नाही. सध्या "विमुक्त जाती व जमातींना" ऒलरेडी आरक्षण आहेच व आता "ओबीसी समाजाचा" प्रश्न जळता निखारा आहे व ह्यांच्या यशस्वी परिणांमांमुळे सध्या पुढारलेल्या मानल्या जाणार व उच्चवर्णीय वर्गाने म्हणजे ब्राम्हणांनी, मराठ्यांनी, ठाकुरांनी, पटेलांनी उद्या त्यांच्यासाठी "आरक्षणाची" मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको. आज हे सर्व चलती नाणी आहेत हे पाहून "धार्मीक आरक्षणची" मागणी पुढे आली व ते लागू झाले तर आश्चर्यचकीत होऊ नका. सध्याच्या सरकारने आणलेला "सच्चर आयोग" ही त्याचीच नांदी आहे. ह्या सर्वांचा प्रमुख दुष्परिणाम असा की देशाच्या कल्याणासाठी एकत्र झटणाया सामान्य जनतेत ह्यामुळे एक "दुही" निर्माण होत आहे, त्यांची मने दुर जात आहेत, काही ठराविक वर्गाला चुचकारले जात आहे व काहींना उपेक्षीत ठेवले जात आहे हे भावना निर्माण होत आहे. थोडक्यात आधी "एक" असणारी मने आता "दुभंगली" जात आहेत. अशी दुभंगलेली मने जेव्हा देशाच्या विकासाठी एकत्र काम करतील तेव्हा त्यातुन निर्माण झालेला परिणाम केवळ शुन्य असेल. अशी दुभंगली मने देशाचा विकास करुन त्याला प्रगतीपदावर न्हेऊन त्याला "एक महासत्ता" बनवू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात येत नाही. समजा जरी लोक समजायला लागले तरी काही "हितशत्रू" बरोबर पुन्हा वाद निर्माण करतात ...
ह्या सर्व गोष्टींमुळे देशासाठी "विवीध पातळीवर काम" करणाया सामान्य जनतेच्या मनाच्या दोलनामय परिस्थीतीचा विचार कोणी करत नाही. ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? ह्या देशात काम करणाया हजारो मुस्लीम व ख्रीस्ती डॊक्टर्स, इंजिनीयर्सना हा देश आपला वाटला नाही तर त्यांच्या काम करण्यामागे "समर्पण" किती राहिल ? मागास आरक्षणाचा लाभ घेऊन आज देशाच्या यंत्रणेत मोठ्या पदावर काम करणाया अधिकायांना बाहेरचे "आरक्षण आंदोलन व त्यावर येणाया प्रतिक्रीया" याबद्दल काय वाटत असेल ? त्या परिस्थीतीत ते आपले काम पुर्णपणे "निष्पक्षपातीपणे" करतील का वा त्यांनी करावे का ? देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेऊन अहोरात्र उभे राहणाया विवीध जाती, जमाती मधल्या सैनीकांमध्ये दुहीची भावना वाढीस लागली तर काय ? तसे पहायला गेले तर ह्यांचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होणे अपेक्षीत नाही व मान्यही नाही. पण मी मानतो की आजूबाजूला घडणाया घटनांचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या मनावर व पर्यायाने त्यांच्या "कामगिरीवर" होत असेल. अशा परिस्थीतीत आपला देश खरेच "एक वन नेशन" राहिल का ? याचा विचार आत्ताच परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधी केला पाहिजे व काही तरी कठोर उपाय योजले पाहिजेत.

आता एक तिसरीच शक्ती आपले डोके वर काढू पहात आहे ती म्हणजे "प्रादेशिक अस्मितेचा" पुरस्कार करणायांची. भारतासारख्या एका मोठ्या देशात अनेक लोक राहतात, त्यांची संस्कॄती भिन्न आहे, भाषा भिन्न आहे, आचारविचार भिन्न आहेत. आपल्या जमातीची वा समुहाची ओळख टिकून रहावी यासाठी त्यांनी आपापल्या "संस्कॄती व मुल्यांची" जपणूक केली तर त्यात चुकीचे काही नाही पण पुढे जाऊन याचे परिवर्तन हे "प्रादेशिक अस्मितेत" झाले व हा प्रश्न संवेदनाशील झाला. भारताच्या विवीध भागात राहणाया "बंगाल्यांची अस्मिता, आसामी अस्मिता, मराठी अस्मिता , गुजराती अस्मिता [ हो, आता ही पण महत्वाची झाली आहे, लोकांनी निवडणूकी जिंकल्या त्याच्या जोरावर ] , दक्षिणेची वेगळी अस्मिता, युपी / बिहारची स्वता:ची वेगळी अस्मिता , वरच्या इशान्य भारताच्या जनतेची प्रादेशीक अस्मिता" असे अनेक आयाम या विषयाला मिळाले. जेव्हा व्यापार, व्यवसाय , नोकरीच्या निमीत्ताने ही लोक देशातल्या विवीध भागात पसरले व काही कारणाने तेथील लोकल अस्मिता व ह्या लोकांनी आपल्या बरोबर आणलेली स्वता:ची अस्मिता यांच्या संघर्षाची परिस्थीती निर्माण झाली व काही ठिकाणी "हिंसक आंदोलने" पहायला मिळाली. तसे पहायला गेले तर दक्षिण भारताचे पहिल्यापासून वरच्या भागात राहणाया व हिंदी बोलणाया लोकांशी पहिल्यापासून वाकडे होतेच, शक्यतो त्यांनी वरच्यांना "आपण उपरे आहोत" याची वेळोवेळी जाणीव करुन द्यायचा प्रयत्न केला. ७० च्या दशकात मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या निमीत्तने उभारलेल्या आंदोलनातुन "मराठी अस्मितेची" नवी ओळख भारतला पटली व शिवसेनेसारख्या प्रादेशिक प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांना राजकारणात चांगले दिवस येण्यास सुरवात झाली. तामिळनाडूत तर पहिल्यापासूनच "प्रादेशिक द्रमुक व अण्णाद्रमुक" ह्यांनी सत्ता आपल्याकडे ठेवली होती व कॊंग्रेस, भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांना इथे पाय रोवायची संधी दिली नाही. त्यानंतर "आसामी अस्मितेच्या" निमीत्ताने आसामात झालेली हिंसक आंदोलने, आसु [ ऒल आसाम स्टुडंट युनियन ] सारख्या विध्यार्थी संघटना व त्यानंतर त्याचां राजकीय अवतार "आसाम गण परिषद" यासारख्यांनी पण "प्रादेशिक अस्मिता" जोपासली. सध्याच्या काळात सगळ्यात मोठ्ठी समस्या म्हणजे व्यापार व नोकरीच्या निमीत्ताने बाहेर गेलेल्या बिहारी / युपी जनतेने आपल्या बरोबर न्हेलेली आपली संस्कॄती व अस्मिता ह्यांचा तिथल्या लोकल अस्मितेशी झालेला संघर्ष. मग हे आसामात असो, महाराष्ट्रात असो वा दक्षिणेत असो ही एक राष्ट्रीय समस्या व्हायला सुरवात झाली, त्यातच त्यांच्या "नेत्यांनी" अनावश्यक विधाने व वाद निर्माण करुन ही परिस्थीती चिघळावली व ह्याचा परिणाम म्हणजे झालेली "हिंसक आंदोलने" व यासाठी वेठीस धरली गेलेली सामान्य जनता व विस्कळीत झालेले जनजीवन.प्रारंभी "मराठी माणसाचा विकास म्हणजे गुजरात्याच्या कानफ़ाडीत मारणे नव्हे" ही भुमीका मांडणाया राज ठाकर्‍यांना पण काळ बदलतोय म्हणून "बिहायांच्या थोबाडीत" मारण्याची कॄती करावी लागली व ह्या आंदोलनाला "प्रादेशिक द्वेशाची" एक वेगळी किनार मिळाली.ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....

आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???

"दी वन नेशन " म्हणजे काय नक्की ? नेशन म्हणाजे येथे राहणारे लोक, ह्या भारतात राहणारी १०० करोड जनता. ही नुसती १०० करोडाची गर्दी जमवून काही होणार नाही तर तिथे पाहिजे ह्यांच्यात "ऐक्याची भावना" , आपण एका "महाशक्ती असलेल्या समुहाचा भाग" आहोत ह्याचे समाधान देणारी भावना. अशी भावना निर्माण झाली की त्यांचे "शक्तीशाली गट" बनतात व हेच गट "हाच देश" पुढे न्हेतात. पण त्याच्यासाठी गरज आहे ती लोकांनी आधी " वन वेशन" ही संकल्पना आमलात आणण्याची ...
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....
विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत.
पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?

यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!

Friday, May 16, 2008

परवाच एका स्फोटात मेलो ...

परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. -


स्वर्गात जाताच "टिळक" भेटले,
"नमस्कार" म्हणताच प्रसन्न हसले,


..... टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलयं का काही?
म्हटलं , छे हो, सरकारच डोकं ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने "सुभाषबाबु" आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -


मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली !!!
नेताजी ! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमच असत आझाद कश्मीर होतो! -


तितक्यात....
दुरवर "सावरकर" दिसले म्हणुन धावलो,
म्हटलं 'तात्या', आज जन्मचा पुण्य पावलो ,
म्हणाले, सध्या तरी सगळ कसं निवांत आहे,
स्वर्र्गात "कांग्रेस" वाला नाही तर सगळं कसं शांत आहे -

त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधतुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिन्चा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले
पण घडलं भलतचं , ते माझ्यावरच ओरडले -


काय रे? कोण्या "जेम्स लेनने" म्हणे बत्तमिजी केल्ली
तुमची अक्कल, तेव्हा सांगा कोठे चरायला गेली? -
मान वर करायची हिम्मत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!


कबुल आहे महाराज, तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही।
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावज हेरतात
ब्र म्हणयचा अवकाश, लगेच गाढवाचे नांगर फिरतात .

सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले
आमच केविलवाण जगणं बघुन डोळ्यात पाणी तराराले
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खाने थाराथाराले
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले -


पाय लटपटले....
वाटलं आता, कम्बख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समजपण,
मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते
न्याय-कठोर असले तरि ह्रुदय त्यांचे 'रीते' नव्हते .


म्हणले, नाव सांग फक्त, खाली जाउन समाचार घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्‍यांच्या जिवाशी खेळतो. -

फक्त एकच काळवीट मारले, म्हणत आपले माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखली गरिबानां चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातल पाणी आडवलं
कळालं , हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल -

मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............


अहो आश्चर्यम,स्वर्गात मला "औरंग्या" भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला

"जिन्हा" सुध्हा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखावर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल -


डिसक्लेमर : ह्या कवितेचा "मुळ कवी अथवा लेखक" मला तरी अज्ञात आहे म्हणून त्याचे नाव देता येत नाही.मला ही कविता एका "ढकलपत्राद्वारे" आली व ती खुप आवडल्याने मी ती माझ्या "ब्लॉग" वर टाकत आहे।
कुणाला "मुळ लेखकाचे नाव" माहित असल्यास कळवावे, त्याच्या नावाचा उल्लेख करण्यात येईल व त्याच्या परवानगीने ही कविता इथे ठेवायची का नाही हे ठरवता येईल ...

Thursday, May 15, 2008

मी जर हा असतो तर : भाग २

ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...

मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो .....
******************************************************************************
मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता. झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते....
********************************************************************************
मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...
*********************************************************************************
मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती....
*********************************************************************************
मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेत येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....
********************************************************************************
मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते।
समजा राजने त्या २०००० लोकां बरोबर आपल्या ही तंगड्या गळ्यात घालुन परत हाकलले तर कसे याचा विचार केला असता....
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते....
**********************************************************************************
मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता.
कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.....
***********************************************************************************
मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता यीएल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते।
मराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना? ह्याची योग्य काळजी घेतली असती .....
*********************************************************************************
मी जर देवेगैडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले अस्ते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात संसदेत बसुन कामकाज चालू असतानाही झोपा कशा काढाव्यात ह्याचे खास वर्ग घेतले असतेस....
********************************************************************************
मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.
******************************************************************************
मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....
*******************************************************************************
मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल , भुताखेतांच्या बातम्यांसाठी एक चॅनल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ....