Tuesday, March 11, 2008

जमाव असा का वागतो ?

आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या.
कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला.
रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या.
खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर?


मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यासारखी घटना आहे। जर त्या मयताच्या कुटुंबियांच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा ....

पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्‍या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ?

माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड .....
ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरण्यासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्‍या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे तिकीट " तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ?

राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........

जय महाराष्ट्र , भारत माता की जय ...

2 comments:

Sneha said...

tu je mandalay he katu satya aahe ... pan tula yaa madye samanya manasachii kahich ka chuki janavat naahii... loka tamasha karatat aani to apan pahato....
te nagarsevakachya nivadnukit ubhe rahatat aani apan mat deto.... arthat dila tar nahi tar apali mat pohachatat...

छोटा डॉन said...

Tu mhanates te agadi barobar aahe.
Aapanach aapale "Leader" tharavayalaa nalaayak tharatto aahot.... Aatta lagech nahi pan bhavishyaat yaatun marg nighel asa maza vishwas aahe...
Tamasha karanaaryaa lokaaMche mhanashil tar tyaasaathi samaaj prabodhanachi garaj aahe. Ase honyaamagachi karane mhanaje bekaari, daridry, mulabhut garajaa purn honyaat yet asalelee adachan va sarvaat mahatvaache mhanaje "EDUCATION"...
yaa sarv goshteevar maat karanyaasaathi sagalyaani milun prayatn karane garajeche aahe...